परळच्या ब्रिजवर भीषण अपघात, बाईकचा कंट्रोल सुटला अन् डंपरवर आदळले, तिघांचा जागीच मृत्यू

मुंबई: ट्रिपल सीट बाईक चालवणं किती धोक्याचं ठरु शकतं याचंच एक उदाहरण मुंबईतील परळ येथे बघायला मिळालं. येथे एका बाईकवर ट्रिपल सीट जात असलेल्या तिघांचा भीषण अपघात होऊन त्यांचा मृत्यू झाला आबे. परळ पुलावर हा भीषण अपघात झाला. या अपघातात दोन तरुणींसह एकाचा मृत्यू झाला आहे. तनिष पतंगे (वय २४), रेणुका ताम्रकर ( वय २५) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. तर एकाची ओळख अद्याप पटलेली नाही.

हे तिघेही बाईकवरुन ट्रिपल सीट जात होते. तेवढ्यात दुचाकी वरील ताबा सुटल्याने दुचाकी विरुद्ध दिशेने येणाऱ्या डंपरला आदळली आणि हा भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील दोन तरुणी आणि एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ट्रिपल सीट बाईक चालवणं या तरुणांना चांगलंच महागात पडलं आहे.

हा अपघात किती भीषण असेल याचा अंदाज वाहनावरुन येतो. बाईक डंपरवर इतक्या जोरदार धडकली की बाईचा समोरचा भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला. तर, ट्रकचंही नुकसान झाला आहे. डंपरला धडकल्यानंतर बाईवरील तिघेही जखमी झाले, त्यांच्या डोक्याला जबर मार लागला आणि त्यांचा तिथेच मृत्यू झाला. या अपघातानंतर तिघांना तात्काळ केइएम रुग्णालयात नेण्यात आले, मात्र तिथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

मुलाला मारण्याआधी गायली अंगाई; कफ सिरप, डॉक्टरांना फोन अन्.. सूचनाने चौकशीत काय-काय सांगितलं?
Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

Mumbai latest newsmumbai live newsmumbai news in marathimumbai today newsparel bridge accident mumbaiparel bridge accident newsparel mumbai
Comments (0)
Add Comment