लोकसभेची लढाई भाजप विरुद्ध जनतेमध्येच, त्यामुळे…; आमदार सतेज पाटील यांचा टोला

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर

दोन महिन्यात होणारी लोकसभा निवडणूक भाजप विरुध्द जनता अशी होणार आहे, त्यामुळे भाजप ४०० की २०० जागा पार करणार हे जनताच ठरवेल, असा टोला काँग्रेसचे विधिमंडळातील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मारला. दरम्यान, महात्मा फुले यांच्या जीवनावरील सत्यशोधक हा चित्रपट काँग्रेसच्या वतीने जनतेला दाखविणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आ. सतेज पाटील म्हणाले, भाजपचा आत्मविश्वास गमावला आहे, त्यांची प्रतिमा चांगली आहे असा दावा करत आहेत, मग नऊ वर्षे केलेल्या कामांवरच त्यांनी निवडणूक लढवली पाहिजे. मात्र, त्यांचा आत्मविश्वास गेल्याने पक्ष फोडाफोडी करत आहेत.

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना भाजपने दिलेल्या ऑफर बाबत विचारले असता ते म्हणाले, शिंदे कुटुंबीय गेल्या ५० वर्षांपासून काँग्रेसबरोबर एकनिष्ठ आहे. त्यांना केवळ टार्गेट करण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू आहे. पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांना महाविकास आघाडी सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरूच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, काँग्रेसच्या वतीने सत्यशोधक हा चित्रपट मोफत दाखविण्यात आला. राज्यात अनेक ठिकाणी हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार सतेज पाटील, आमदार जयश्री जाधव, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर सचिन चव्हाण, यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी एकत्रित सत्यशोधक चित्रपट पाहिला.

Source link

bjp vs janatalok sabha electionlok sabha election bjp vs janatamla satej patilआमदार सतेज पाटीललोकसभा निवडणूकलोकसभा निवडणूक भाजप विरुध्द जनता
Comments (0)
Add Comment