केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून…, राममंदिर सोहळ्यासाठी सार्वजनिक सुट्टीला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान

मुंबई: अयोध्येच्या राम मंदिरातील रामलल्ला प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने राज्य सरकारने उद्या, २२ जानेवारी रोजी जाहीर केलेल्या सार्वजनिक सुटीला आव्हान देणाऱ्या सार्वजनिक सुटीला याचिकेवर मुंबई हायकोर्टात विशेष खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. रविवारच्या सुटीच्या दिवशी न्या. गिरीश कुलकर्णी व न्या. नीला गोखले यांच्या विशेष खंडपीठासमोर ऐतिहासिक सुनावणी होत आहे. राज्य सरकारचा निर्णय हा धर्म निरपेक्षतेच्या मूळ तत्त्वांच्या आणि राज्यघटनेच्या मूळ त्तत्वांच्या विरोधात कसे आहे, हे दाखवण्यासाठी याचिकाकर्त्या चार विधी विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थिनीने सुप्रीम कोर्टच्या काही निवाड्यांचा दाखला खंडपीठाला दिला.

केवळ निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून धर्म निरपेक्षतेच्या व राज्यघटनेच्या मूलभूत तत्त्वांचे उल्लंघन करत सरकारने हा निर्णय घेतला आहे”, असा आरोप याचिकाकर्त्यांनी याचिकेत केला आहे. तसेच सुटी रद्द करण्याची विनंती याचिकेत करण्यात आली आहे. सुनावणीला राज्य सरकारतर्फे बाजू मांडण्यासाठी महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ हे उपस्थित असून त्याशिवाय अनेक बडे वकील उपस्थित आहेत. विद्यार्थ्यांच्या या याचिकेला विरोध दर्शवण्यासाठी ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी डॉ. जयश्री पाटील याही मुंबई उच्च न्यायालयात उपस्थित आहेत.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाबाबत चुकीची माहिती पसरवू नका, केंद्र सरकारचा माध्यमांना इशारा

८ मे १९६८च्या अधिसूचनेप्रमाणे सार्वजनिक सुटी जाहीर करण्याचा राज्य सरकारला अधिकारच नाही. तो अधिकार केंद्र सरकारला आहे. असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांनी केला. मात्र, “तुम्ही त्या अधिसूचनेला आव्हान दिलेले असताना त्या अधिसूचनेची प्रतच याचिकेत जोडलेली नाही, त्यामुळे त्या विनंतीचा विचार करणे कठीण आहे”, असे मत खंडपीठाने नोंदवले. आमच्याकडे आता त्या अधिसूचनेची प्रत नाही. मात्र तसे असले तरी मुळात कायद्याप्रमाणेच राज्य सरकारला सार्वजनिक सुटी जाहीर करण्याचा अधिकार नाही असा विद्यार्थिनी शिवानी अगरवाल यांनी खंडपीठासमोर युक्तिवाद केला.

“सार्वजनिक सुटी जाहीर करायची की नाही, हा पूर्णपणे राज्य सरकारचा धोरणात्मक भाग असल्याचा युक्तिवाद महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांनी केला.सरकारचा निर्णय हा जुलमी व मनमानी आहे. असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे पण राज्य सरकार आपल्या अधिकारात वेगवेगळ्या दिवसांना सार्वजनिक सुटी जाहीर करत असते आणि जेव्हा धार्मिक रीती रिवाज किंवा सोहळे, हे अत्यावश्यक भाग असतात त्यावेळी वेगवेगळ्या धर्मासाठी सरकार असे निर्णय घेत असते. त्यामुळे धार्मिक आधारावर घेतलेला सरकारचा निर्णय मनमानी व बेकायदा आहे, असे म्हणता येत नाही. तसेच आपल्या धर्मनिरापेक्षतेचे तत्त्व हे इतके नाजूक नाही. आपल्या देशाचे नागरिक हे सर्व धर्मांचे सोहळे एकोप्याने साजरे करत असतात. याचिकाकर्ते हे केवळ एका गटाचा विचार करून अर्थ काढत आहेत असा युक्तिवाद महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांनी खंडपीठासमोर केला. अद्याप या याचिकेवरील युक्तिवाद सुरु असून न्यायालयाच्या निर्णयाकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

अयोध्येत राम मंदिर उत्सव, कुंभार बांधवांची लगबग; लाखो मातीच्या पणत्यांची निर्मिती, प्रचंड मागणी

Source link

22nd january public holidaychallange against 22 jaunuary public holidaymumbai newsram temple consecrationमहाराष्ट्र सरकारमुंबई उच्च न्यायालयमुंबई न्यूजराम मंदिर प्राणप्रतिष्ठा
Comments (0)
Add Comment