नगरमध्ये ट्रॅक्टर, एसटी आणि इको कार एकमेकांवर आदळल्या, भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

अहमदनगर: नगर कल्याण महामार्गावर ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर, ठाणे – मेहकर एसटी बस आणि इको गाडी यांचा भीषण अपघात झाला. ढवळपुरी फाट्या नजीक आज बुधवारी (२४ जानेवारी) पहाटे २.३० वाजता भीषण आपघात झाला असून यात ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यापैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तर एकाचा अहमदनगर येथे उपचार चालू असताना मृत्यू झाला आहे. सहायक पोलिस निरिक्षक प्रमोद वाघ आणि टीम घटना स्थळी दाखल झाली असून अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्यात आली.

सध्या आपघात ग्रस्त वाहनं रस्त्यावरुन बाजुला केली असून वाहतूक सुरळीत झाली आहे. दरम्यान, अपघात ग्रस्तांची ओळख पटविण्याचे काम चालू असल्याचे सांगण्यात आले आहे. हा अपघात इतका भीषण होता, की यामध्ये तिन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. या भयानक घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.

धुळे-सोलापूर महामार्गावर अपघात, संकटमोचक म्हणून धावून आले मनोज जरांगे, अपघातग्रस्तांना मदत

अपघातातील जखमींना प्राथामिक उपचारासाठी पारनेर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना अहमदनगर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आलं आहे. अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

पत्नी आणि मेहुणीकडून सततचा छळ, ॲनिमेशन कंपनीचं स्वप्न अर्ध्यावरच सोडून नारायणने आयुष्य संपवलं
Read Latest Maharashtra News And Marathi News

Source link

accident of three vehiclesAhmednagar Accident Newsahmednagar accident six killedahmednagar news todaylatest newsmarathia news today
Comments (0)
Add Comment