मराठ्यांच्या मोर्चामुळे सरकारला टेन्शन, आरक्षणाशिवाय माघार नाही, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

म. टा. प्रतिनिधी, येरवडा: ‘सरकारला वाटले मराठे कुठे येणार मुंबईला. पण मराठे बॅगा भरून मुंबईकडे निघाल्यावर सरकारला टेन्शन आले आहे. मार्गात कितीही अडचणी आल्या, तरी मुंबईला जाणारच आणि आरक्षण मिळाल्याशिवाय माघारी येणार नाही,’ असे मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी सणसवाडीत सांगितले.

मराठा आरक्षणासाठी मुंबईकडे निघालेले मनोज जरांगे पाटील यांचे पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात फुले उधळून स्वागत करण्यात आले. नगरहून निघालेला मोर्चा मंगळवारी रांजणगावात आल्यावर गणपतीचे दर्शन घेऊन ते पुढे निघाले. मोर्चामध्ये शेकडोच्या संख्येने वाहने आणि हजारो समर्थक आहेत. शिक्रापूरमध्ये आल्यावर नागरिकांनी ढोल-ताशाच्या निनादात आणि पुष्प उधळून त्यांचे स्वागत केले. त्यानतंर रात्री साडेनऊच्या सुमारास जरांगे पाटील यांचा ताफा सणसवाडीत पोहचला. सणसवाडीकरांनी प्रचंड उत्साहात त्यांचे स्वागत केले. या वेळी जरांगे पाटील यांनी रस्त्यावर वाहनांचा ताफा थांबवून जीपवर चढून शेकडो नागरिकांच्या गराड्यात भाषण केले. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास मनोज जरांगे पाटील यांनी वढू बुद्रुक येथे जाऊन छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतले.

‘अटल सेतू’वर टोलचा घोळ, परतीच्या प्रवासात अधिक रक्कम वसूल, कोट्यवधींचा घोळ झाल्याची भीती

रात्री उशिरा जरांगे पाटील शहरात (वाघोली) दाखल झाले. उबाळेनगर येथील एका फार्म हाउसवर ते मुक्काम करणार आहेत. मुक्कामाच्या ठिकाणी पुणे पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. आज, बुधवारी सकाळी ते पिंपरीकडे कूच करणार आहेत. या वेळी रस्त्यावर पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे.

Aarti of Ranjangaon Ganpati by Manoj Jarang : जालना, बीड, नगरची शीव ओलांडून जरांगे पुण्यात धडकले

Source link

devendra fdanavisEknath Shindemanoj jarangemaratha morchaMaratha ReservationPune newsमनोज जरांगेमराठा आरक्षणमराठा आरक्षण आंदोलनमराठा मोर्चा
Comments (0)
Add Comment