दिल्लीतील संचलनात कोकणातील विद्यार्थी घेणार सहभाग; साहिल पडवळची एनसीसी विभागामार्फत निवड

रत्नागिरी: ५८ महाराष्ट्र बटालियन सिंधुदुर्ग या बटालियनचा साहिल पडवळ या विद्यार्थ्यांची २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे होणार्‍या संचलनात एनसीसी विभागामार्फत निवड करण्यात आली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या एकमेव विद्यार्थ्याची निवड झाली आहे. कमांडिंग ऑफिसर कर्नल दीपक दिया दयाळ सेना मेडल प्राप्त यांचे तसेच सुभेदार मेजर दिनेश गेडाम यांचे मार्गदर्शन यांचे मार्गदर्शन लाभले.
बालपणीच्या मित्रांनी एक एकरात फुलवली शेती; पपईच्या लागवडीनं बदललं दोघाचं भविष्य, लाखोंची कमाई
हा विद्यार्थी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्याच एन ओ जाधव व प्राचार्य कजरेकर बांदा कॉलेज यांचेही मार्गदर्शन लाभले. अनेक फेऱ्या पूर्ण केल्यानंतर दिल्ली येथे होणाऱ्या संचालनासाठी त्याची अंतिम निवड करण्यात आली आहे. ही कोकणासाठी, सिंधुदुर्ग जिल्हयासाठी अभिमानास्पद बाब आहे अशी माहिती लेफ्टनंट प्राध्यापक डॉ.एम आर खोत यांनी दिली. या एनसीसी बटालियनमध्ये रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण साडेतीन हजार मुलांचा सहभाग आहे. तसेच ५५ शाळा महाविद्यालयांचा यामध्ये सहभाग आहे. यामधून साहिल पडवळ याची निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर ग्रुप आणि ५८ महाराष्ट्र बटालियन मधील साहिल पडवळ याची निवड झाली आहे.

एका मांडीवर अजित पवार, दुसऱ्या मांडीवर हसन मुश्रीफ अन् खांद्यावर प्रफुल पटेलांना बसवलं : संजय राऊत

साहिल पडवळ हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महाविद्यालयाचा विद्यार्थी गेले दोन ते तीन महिने विविध फेऱ्यांमधून निवडला गेला आहे. परेडसाठी लागणाऱ्या अनेक निवड फेऱ्या साहिलने मेहनतीने पूर्ण केल्या आहेत. अशी माहिती लेफ्टनंट प्राध्यापक डॉ.एम आर खोत यांनी दिली. कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यासाठी असलेल्या ५८ महाराष्ट्र बटालियनमधून या विद्यार्थ्यांची निवड २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या दिल्ली येथील संचालनासाठी झाल्याने त्याचे विविध स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

Source link

circulation in delhiRatnagiri newsrepublic day newsrepublic day paredesahil padwal newsप्रजासत्ताक दिन बातमीप्रजासत्ताक दिन संचलनरत्नागिरी बातमीसाहिल पडवळ बातमी
Comments (0)
Add Comment