म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर : पर्यटकांना राज्यातील व्याघ्रप्रकल्पात आकर्षित करण्यासाठी सोयीसुविधांमध्ये एकसूत्रता आणणे आवश्यक आहे. हे प्रत्यक्षात आणण्यासाठी पाचही व्याघ्रप्रकल्पांचा एकत्रित पर्यटन विकास आराखडा तयार करावा, असे स्पष्ट निर्देश वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहेत. वन विभागामार्फत उत्पादित वस्तूंची वनामृत या एकाच ब्रँडनेमद्वारे प्रसिद्धी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्यातील व्याघ्रसंवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर झाली. यात अधिकाऱ्यांना दिशानिर्देश देताना ते बोलत होते. मुनगंटीवार म्हणाले, ताडोबा-अंधारी, पेंच-बोर, मेळघाट, सह्याद्री आणि नवेगाव-नागझिरा या व्याघ्रप्रकल्पांचा पाच वर्षांसाठी एकत्रित पर्यटन आराखडा तयार करण्यात यावा. एखाद्या व्याघ्रप्रकल्पात अभिनव उपक्रम राबविले गेले असतील तर त्याची इतर ठिकाणी अंमलबजावणी करता येईल काय, याचा विचार व्हावा. व्याघ्रप्रकल्पात वन्यजीवांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण राहील हे पाहावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
राज्यातील व्याघ्रसंवर्धन प्रतिष्ठानच्या नियामक मंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृहावर झाली. यात अधिकाऱ्यांना दिशानिर्देश देताना ते बोलत होते. मुनगंटीवार म्हणाले, ताडोबा-अंधारी, पेंच-बोर, मेळघाट, सह्याद्री आणि नवेगाव-नागझिरा या व्याघ्रप्रकल्पांचा पाच वर्षांसाठी एकत्रित पर्यटन आराखडा तयार करण्यात यावा. एखाद्या व्याघ्रप्रकल्पात अभिनव उपक्रम राबविले गेले असतील तर त्याची इतर ठिकाणी अंमलबजावणी करता येईल काय, याचा विचार व्हावा. व्याघ्रप्रकल्पात वन्यजीवांची संख्या वाढण्याच्या दृष्टीने अनुकूल वातावरण राहील हे पाहावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
पाचही व्याघ्रसंवर्धन प्रकल्पात वंदे मातरम वनसेवा केंद्र सुरू करण्यात यावे. आपले सरकार सेवा केंद्रांप्रमाणे वन विभागाच्या योजनांची माहिती आणि सेवा या केंद्रातून सुरू करण्याचे निर्देशही मुनगंटीवार यांनी दिले.
बैठकीला वनविभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक शैलेश टेंभुर्णीकर आणि महिप गुप्ता यांच्यासह राज्यातील व्याघ्रप्रकल्पांचे क्षेत्र संचालक, इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
वनमंत्र्यांच्या सूचना
– पर्यटकांसाठी उत्तम सुविधा उभारा.
– सेल्फी पॉइंटची निर्मिती करावी.
– घरांच्या भिंतीवर वन्यजीव आणि पर्यावरणपूरक चित्रे रंगवा.
– बांबूच्या फुलोऱ्याचे व्यवस्थापन करणे.
– बीज साठवण, अग्निसुरक्षेकडे अधिक गंभीरतेने लक्ष देणे.
– माहिती पोहचविण्यासाठी क्युआर कोड तयार करावा.
– नदी, तलावाच्या परिसरात हाऊसबोट संकल्पना राबवावी.