इंडिया आघाडीतून बाहेर पडणाऱ्या नितीन कुमारांवर राऊतांचा हल्लाबोल, ‘पलटुराम’ म्हणत सुनावलं

अहमदनगर : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजीनामा देऊन भाजपच्या पाठिंब्यावर पुन्हा सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. यामुळे विरोधकांच्या इंडिया आघाडीला धक्का बसल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी नितीशकुमार आणि भाजपवर टीका केली आहे. ‘बिहारमध्ये नितीशकुमार इंडिया आघाडीपासून दूर केले तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. आघाडीची परिस्थिती उत्तम आहे. नितीशकुमार यांचे मानसिक स्वास्थ्य ठीक नाही. त्यांनी राजीनामा दिला, तो त्यांचा छंद आहे. अयोध्येत राम आहेत तर बिहारमध्ये पलटुराम आहे. सगळ्यात मोठे पलटूराम भाजप आहे,’ अशी टीका शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी केली.

अहमदनगरमध्ये प्रसार माध्यमांशी संजय राऊत बोलत होते. पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे देताना राऊत म्हणाले, ‘मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी आपल्या सर्व मागण्या मान्य झाल्याचे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कडकडून मिठी मारली. आता त्यांनीच सांगावे की, मराठा समाजाची फसवणूक झाली की नाही? कोणाचे ओरबाडून कोणाला आरक्षण दिले जाऊ नये. मात्र, ओबीसींवर अन्याय झाला आहे म्हणून मंत्री छगन भुजबळ सरकारमध्ये अस्वस्थ असतील तर त्यांनी राजीनामा द्यावा आणि बाहेर पडावे,’ असेही राऊत म्हणाले.

राऊत पुढे म्हणाले, काँग्रेसचे नेते राहुल गांधींची न्याय यात्रा का रोखता? जर तुमचा चारशे पारचा नारा असेल तर कशाला घाबरता? भाजपने आता घाबरू नये आमच्याशी मुकाबला करावा. देशात राहुल गांधीची आणि महाराष्ट्रात शिवसेनेची भीती भाजपला वाटते. राहुल गांधी यांच्या यात्रेवर हल्ले केले तरीही ते पुढेच जात आहेत, असेही राऊत म्हणाले.

एका मांडीवर अजित पवार, दुसऱ्या मांडीवर हसन मुश्रीफ अन् खांद्यावर प्रफुल पटेलांना बसवलं : संजय राऊत

काँग्रेसच्या शहराध्यक्षाने घेतली भेट..

शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी खासदार संजय राऊत यांची घेतली. पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी खा. राऊत यांना भगवी शाल घालत काळे यांनी त्यांचे ऐतिहासिक नगर शहरात काँग्रेसच्या वतीने स्वागत केले. यावेळी नगर शहरातील राजकीय गुंडगिरी, शैक्षणिक संस्थांच्या भूखंडांसह अन्य भूखंडावर होणारी ताबेमारी याबद्दलची कागदपत्रे, पुराव्यांसह फाईल देत सुमारे वीस मिनिटे चर्चा केली.

या बद्दलचे सविस्तर पत्र काळे यांनी यावेळी राऊत यांना दिले. विविध राजकीय मुद्द्यांवर देखील यावेळी बातचीत झाली. महाविकास आघाडी, आगामी लोकसभा निवडणूक यासह जिल्ह्यातल्या महायुतीचा सामना एकजुटीने करण्याबाबत यावेळी उभयतांमध्ये चर्चा झाल्याचे काळे यांनी सांगितले. संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना किरण काळे यांच्याशी झालेल्या चर्चेचा संदर्भ देत शहरातील राजकीय गुंडगिरी, ताबेमारीवर जोरदार हल्लाबोल केला. वेळेप्रसंगी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला.

दाऊद, छोटा शकीलला शिवसेनेने पळवून लावले, तेथे तुम्ही कोण? राष्ट्रवादीचे नगरचे आमदार संजय राऊतांच्या निशाण्यावर

Source link

india alliancenitish kumar leave india alliancenitish kumar newsSanjay Rautsanjay raut criticized nitish kumarनितीश कुमारनितीश कुमार राजीनामासंजय राऊतसंजय राऊत अहमदनगर
Comments (0)
Add Comment