…अन्यथा सागर बंगल्यावरील बॉसला राजीनामा द्यावा लागेल; नरसय्या आडम संतापले

सोलापूर : सागर बंगल्यावर माझा बॉस बसलाय… त्यामुळे पोलीस माझं काही वाकडं करू शकत नाही, असं वादग्रस्त वक्तव्य सोलापूरच्या माळशिरसमध्ये हिंदू जनआक्रोश मोर्चात बोलताना भाजप आमदार नितेश राणे यांनी केलं. त्यांच्या विधानाचा माकप नेते नरसय्या आडम यांनी जोरदार समाचार घेतला. नारायण राणे माझे चांगले मित्र आहेत. मी मुंबईला गेल्यावर नारायण राणेंना भेटून सांगतो, तुमच्या मुलाला आवरण्याचा प्रयत्न करा. मुस्लीम समाजाविरोधात इतकं विष ओकणं बरं नाही. मुस्लीम समाज हा देखील भारताचा नागरिक आहे. देशात हिंदू आणि मुस्लिम यांनी एकत्रित संघर्ष केल्याने भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे, अशा शब्दात नरसय्या आडम यांनी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेंना झापलं.

माजी आमदार व माकप नेते नरसय्या आडम हे सोमवारी दुपारी सोलापुरातील आशा वर्करच्या आंदोलनात सहभागी झाले होते. भाषणानंतर नरसय्या आडम यांनी माध्यमांशी संवाद साधताना नितेश राणेंना समज देण्याचा प्रयत्न केला. सोलापुरातील माळशिरसमध्ये येऊन नितेश राणे यांनी चिथावणीखोर भाषण केलं. त्यांच्या भाषणावर आडम यांनी कडाडून टीका केली.

नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य; वडेट्टीवारांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले- बंगल्यावर बसलेले दीर्घकाळ टिकत नाहीत
राज्यात बॉस कोणी नाही, तसे असेल तर फडणवीसांना राजीनामा द्यावा लागेल

हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना नितेश राणे यांनी वादग्रस्त आवाहन केलं होतं. पोलिसांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांकडे वाकड्या नजरेने पाहिलं तर दोन चापटा मारून या, तुम्हाला कोणी हात लावू शकत नाही. एकच फोन आला पाहिजे. नितेश साहेब कार्यक्रम केलाय आता आम्हाला वाचवा… कार्यक्रम झाल्यानंतर तुम्हाला सुखरूप घरी पोहोचविण्याची जबाबदारी आमची असणार… पोलिसांसमोर बोलतोय. माझं काही वाकडं होणार नाही. आपला बॉस सागर बंगल्यावर बसलाय, असं नितेश राणे म्हणाले होते. त्यांच्या याच विधानावर आडम मास्तरांनी संताप व्यक्त केला.

श्रमिकांचा आवाज- नरसय्या आडम
हे राज्य म्हणजे जंगल राज्य आहे काय? देवेंद्र फडणवीस यांनी माझ्यासोबत पाच वर्षे आमदार म्हणून काम केलंय. फडणवीसांनी कधी अशा शब्दांचा किंवा वाक्याचा उपयोग केला नाही. भाजपचे आमदार नितेश राणे बेताल वक्तव्य करत असतील तर फडणवीसांना राजीनामा द्यावा लागेल. बॉस कुणाला म्हणतात.. गुंडगिरी करणाऱ्यांमध्ये बॉस असतो, अशी टीका आडम मास्तर यांनी केली.

निजामी मराठ्यांनी आतापर्यंतची आंदोलने जिरवली, जरांगे पाटील तुमचं आंदोलन जिरवायचं नसेल तर… आंबेडकरांचा सल्ला
प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रात सर्व जागा लढवू नये, इंडिया आघाडीत यावं: नरसय्या आडम

वंचित बहुजन आघाडी राज्यातील सर्व जागा लढविणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी माढ्यात म्हटलं होतं. यावर माजी आमदार नरसय्या आडम यांनी आंबेडकरांनी सर्व जागा लढू नये, अशी विनंती केली आहे. इंडिया आघाडीमध्ये राहून आपल्या ताकदीप्रमाणे जागा वाटप करून घ्यावे, अन्यथा मोदींना रान मोकळं मिळेल. देशातील घटना वाचवण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांना सन्मानाने इंडिया आघाडीत सामावून घ्यावे आणि जागा वाटप करून घ्यावे, अशी विनंती आडम मास्तर यांनी केली आहे.

नितेश राणेंचं म्हणणं खरं असेल तर सागर बंगल्यावरील बॉसला राजीनामा द्यावा लागेल; नरसय्या आडम भडकले

Source link

cpm leader narasayya adamnarasayya adamnarasayya adam slam nitesh raneNitesh Ranenitesh rane newsनरसय्या आडमनरसय्या आडम नितेश राणे टीकानितेश राणेनितेश राणे वादग्रस्त वक्तव्य
Comments (0)
Add Comment