जॅकेट शिवलं, जुनं झालं; नॅपकिन घेतले, घामाने भिजले; मंत्रिपद मिळेना, ठाकरेंनी गोगावलेंना डिवचलं

रायगड : आज मंत्री होणार, उद्या मंत्री होणार, परवा मंत्री होणार, स्वप्नातले पालकमंत्री… नवीन जॅकेट शिवलं, ते जॅकेट घातलं, ते जुनं झालं, नवनवीन नॅपकिन घेतले, तेही घामाने भिजले, पण मंत्रीपद काही मिळतच नाही, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाडचे आमदार भरत गोगवले यांचा समाचार घेतला आहे. या रायगडमध्ये शूरवीर जन्माला आले, निष्ठावंत जन्माला आले, त्याच रायगड जिल्ह्यामध्ये रायगड किल्ल्यावरती गद्दारांना दाखवलं जाणारं टकमक टोक आहे, म्हणून या जिल्ह्याचे नाव आहे, असा इशारा ठाकरेंनी गद्दारांचे नाव घेत विरोधकांना दिला आहे.

हा जनसंवाद नाहीत तर मी माझ्या कुटुंबाच्या जवळ हा संवाद साधतोय. हे सगळं माझं कुटुंब आहे. करोना कालावधीत माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम मी या सगळ्या आपल्या कुटुंबासाठी राबवली होती. काही जणांना यावरूनसुद्धा पोटदुखी आहे. तुम्ही सगळे मला महाराष्ट्रातील जनता आपल्या कुटुंबातील सदस्य मानता तर काही जणांना दारोदारी जाऊन सुद्धा सगळे म्हणतात ‘हड’ अशी विरोधकांची खिल्ली उडवत, ‘सरकार आपल्या दारी, लोक सांगतात जा तुझ्या घरी’ अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील सभेत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

पुणे लोकसभेसाठी मनसेचे पाच शिलेदार शर्यतीत, राज ठाकरेंकडे लेकाने सोपवली यादी, दावेदार कोण?
रायगडचं वारं असं फिरलं नाही तर रायगडाच्या वाऱ्याने मोठमोठे सरकारला झोपवले आहे. दिल्लीला, आग्र्याला झुकवणारा हा रायगड आहे, असा शब्दात रायगडचं कौतुक करत ही भूमी नरवीर तानाजी मालुसरेंची आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आम्ही भगवा फडकवणारच पण या भूमीत आता झेंडा राहिला बाजूला आणि नॅपकिन फडकवणारेच खूप झाले, अशा शब्दात महाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार भरत गोगावले यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे.

छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर, अंजली दमानिया यांचा मोठा दावा; भुजबळ म्हणतात, मला नवीन काही…
इकडे वारकरी संप्रदाय आहे पण यावरून मला बाळासाहेबांनी सांगितलेले एक वाक्य आठवलं की आम्ही सुद्धा वारकरी आहोत आम्ही अन्यायावरती वार करणारे वारकरी. त्याच्यामुळे आपला पंथ एकच, झेंडा एकच, धर्म एकच आहे जो भगवा आपल्या छत्रपतींचा हिंदूंचा आहे, त्या भगव्यामध्ये छेद करणारे व हिंदुत्वामध्ये भेद करणारे भारतीय जनता पक्षाचे गोमूत्रधारी हिंदू आले आहेत, त्यांना आता त्यांची जागा दाखवून द्यायची वेळ आली आहे, असेही आवाहन उद्धव ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील पोलादपूर येथील सभेत केलं आहे.

“रायगडमध्ये प्रचार करण्याची गरज नाही, यावेळी त्सुनामीसारखं मतदान होणार”

Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

Source link

bharatshet gogawaleraigad newsUddhav Thackerayuddhav thackeray raigad rallyuddhav thackeray raigad speechउद्धव ठाकरेउद्धव ठाकरे रायगड भाषणभरतशेठ गोगावले
Comments (0)
Add Comment