narayan rane: ‘मी वेळ देत नाही, पण आघाडी सरकार कोणत्याही क्षणी पडेल’; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे वक्तव्य

हायलाइट्स:

  • मी वेळ देत नाही, मात्र महाविकास आघाडी सरकार कोणत्याही क्षणी कोसळेल- केंद्रीय मंत्री नारायण राणे.
  • शिवसेना आणि संजय राऊत यांच्या प्रश्नांवर मी बोलणार नाही, ते माझे बॉस नाहीत- राणे.
  • संजय राऊत जे काही बोलतात त्याला काही अर्थ नाही- राणे.

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत केलेल्या वक्तव्यांचे पडसाद राज्याच्या राजकारणात उमटत असून महाविकास आघाडीचे मंत्री आणि नेत्यांपासून ते विरोधी पक्षांतील नेते यावर प्रतिक्रिया देत आहेत. त्यापूर्वी ‘मला माजी मंत्री म्हणू नका, दोन दिवसात तुम्हाला कळेल’, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटल्याने राज्यात नव्या चर्चेला सुरुवात झाली. महाविकास आघाडीच्या तीनपैकी एका पक्षात येणार असे ऐकल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटल्यानंतर ही चर्चा अधिकच रंगली आहे. आता या मु्द्द्यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आपली प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडी सरकारबाबत भाष्य केले आहे. (aghadi govt will fall any time but i will not give any time period says union minister narayan rane)

‘आघाडी सरकार कोणत्याही क्षणी कोसळेल, पण वेळ सांगता येत नाही’

केंद्रीय मंत्री नारायण राणे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. त्यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकार पडेल असे म्हणत आहेत, मात्र सरकार पडताना दिसत नाही. त्यावर आपली प्रतिक्रिया काय, असा प्रश्न राणे यांना विचारण्यात आला. त्यावर बोलताना राणे म्हणाले की, ‘चंद्रकात पाटील यांनी हे सरकार केव्हा पडेल अशी वेळ कधीही दिलेली नाही, की हे सरकार एक महिन्यात पडेल की दोन महिन्यात पडेल. पडेल, पडेल… आज ना उद्या पडेल.’

क्लिक करा आणि वाचा- शिर्डी संस्थानचे नवे विश्वस्त मंडळ बेकायदेशीर?; कोर्टात देणार आव्हान

त्यावर आपल्याला काय वाटते असा प्रश्न राणे यांना विचारण्यात आला. त्यावर राणे म्हणाले की, तेच तर मी सांगितले. जे चंद्रकांत पाटील यांना वाटत आहे तसेच मलाही वाटत आहे. मी वेळ कुठे दिला, महिन्यात पडेल की दोन महिन्यात पडेल. हे सरकार कुठल्याही क्षणी पडेल.

क्लिक करा आणि वाचा- ‘शरद पवारांना मुख्यमंत्र्यांवर नाराजी व्यक्त करण्याचा अधिकार नाही’; मुनगंटीवारांचे टीकास्त्र

संजय राऊत यांच्यावर राणे यांची टीका

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार हे ५ वर्षे चालेल असे वक्तव्य केले आहे. त्यावर राणे यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्यावर राणे राऊत यांचा एकेरी उल्लेख करत म्हणाले की, संजय राऊत यांना जे काही वाटते त्याला मी का उत्तर द्यावे… संजय राऊत कोण आहेत? ते माझे बॉस आहेत का?… मी का उत्तर देऊ त्यांच्या प्रश्नांना? पाच वर्षे नाही, दहा वर्षे राहा म्हणावे. एकदा तर ते २५ वर्षे सरकार टिकेल असे बोलले होते. ते काय घेऊन बोलतात, पाणी घेऊन बोलतात की अजून काही माहीत नाही. संजय राऊत जे बोलतात त्याला काही अर्थ नाही.

क्लिक करा आणि वाचा- ‘चंद्रकांत पाटील आमच्या तीनपैकी एका पक्षात प्रवेश करणार असे ऐकले आहे’

Source link

Mahavikas Aghadi governmentNarayan Raneunion minster narayan raneकेंद्रीय मंत्री नारायण राणेखासदार संजय राऊतमहाविकास आघाडी सरकार
Comments (0)
Add Comment