‘संजय राऊतांच्या अंगात आलं आणि महाविकास आघाडी स्थापन झाली’

हायलाइट्स:

  • संजय राऊतांमुळं महाविकास आघाडी सरकार
  • काँग्रेस नेत्याची चौफेर फटकेबाजी
  • महाविकास आघाडीचे श्रेय संजय राऊतांना

सोलापूरः विधानसभा निवडणुकांनंतर भाजप- शिवसेना युती तुटली आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना महाविकास आघाडीचे (maha vikas aghadi) शिल्पकार म्हणून श्रेय देण्यात येते. मात्र, काँग्रेसचे आमदार व मंत्री विश्वजीत कदम यांनी मात्र, महाविकास आघाडीचे श्रेय शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay Raut) यांना दिलं आहे.

मंत्री विश्वजीत कदम सोलापुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत असताना यावेळी त्यांना महाविकास आघाडी सरकारबाबतही भाष्य केलं आहे. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या अंगात आल्यामुळेच महाविकास आघाडी जन्माला आली, असं विधान केलं आहे.

वाचाः मुंबईत भाजप परप्रांतीय कोणाला मानत आहे?; शिवसेनेचा सवाल

‘आजपर्यंत इतिहासात जे घडलं नाही ते हळूहळू महाराष्ट्रात घडलं. ग्रामीण भागात एक म्हण असते, त्या प्रमाणे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या अंगात आल्यामुळेच ही महाविकास आघाडी जन्माला आली,’ असं विधान विश्वजीत कदम यांनी केलं आहे. विश्वजीत कदम यांच्या या विधानाने कार्यक्रमात उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

वाचाः साताराः आसले गावच्या सुपुत्राला लडाखमध्ये वीरमरण

‘मी माझ्या विधानसभेच्या निवडणूक प्रचारात मला मतदान केलं तरी मी विरोधी पक्षाचा आमदार होणार असं मतदारांना सांगत होतो. कारण त्यावेळेस वातावरण तसं होतं. नुकतीच लोकसभेची निवडणूक झाली होती आणि केंद्रात भाजपचे सरकार आलं होतं. वेगळं वातावरण देशात आणि महाराष्ट्रात होतं. दोन महिन्यात महाराष्ट्राच्या इतिहासात घडलं नाही ते घडू लागलं आणि महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आलं,’ असं विश्वजीत कदम यांनी म्हटलं आहे.

वाचाः ‘अनिल देशमुखांवर कायदेशीर कारवाई करावी’

Source link

maha vikas aghadiSanjay RautVishwajeet Kadamमहाविकास आघाडीविश्वजीत कदमसंजय राऊत
Comments (0)
Add Comment