शेतकरी अन् तरुणांकडे दुर्लक्ष; पण अब्जाधीशांची कर्जे माफ, राहुल गांधींची केंद्र सरकारवर टीका

वृत्तसंस्था, जयपूर : ‘शेतकऱ्यांना कृषीमालाला किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हवी आहे, तरुण रोजगाराच्या शोधात आहेत, महिलांना महागाईपासून दिलासा हवा आहे, मात्र त्यांच्या मागण्यांकडे कोणाचेही लक्ष नाही,’ या शब्दांत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारवर हल्लाबोल केला.

राजस्थानातील बिकानेर लोकसभा मतदारसंघातील अनुपगढ येथे प्रचारसभेत गुरुवारी ते बोलत होते. ‘आगामी लोकसभा निवडणुका या देशाची राज्यघटना आणि लोकशाही यांच्या रक्षणासाठी आहेत. ही निवडणूक मागासवर्गीय, दलित, आदिवासी आणि खुल्या प्रवर्गातील गरीब यांची आहे,’ असेही राहुल गांधी म्हणाले.

आज देशातील सर्वांत मोठी समस्या बेरोजगारी ही आहे, त्यापाठोपाठ महागाईमुळे लोक त्रस्त आहेत. मात्र प्रसारमाध्यमे २४ तास नरेंद्र मोदी यांचा चेहरा दाखवतात, असे ते म्हणाले. ‘पंतप्रधान मोदी यांनी देशातील २५-३० अब्जाधीशांची कर्जे माफ केली. हा निधी २४ वर्षांची मनरेगा देयके देण्यासाठी वापरता आला असता. आम्ही सत्तेत आल्यास शेतकऱ्यांची कर्जे माफ करू; तसेच कृषिमालाला आधारभूत किंमत देऊ,’ असे आश्वासन राहुल यांनी दिले. काँग्रेस सत्तेत आल्यास सर्वप्रथम देशात जातनिहाय जनगणना करेल; तसेच सरकारी व सार्वजनिक कंपन्यांमध्ये कंत्राटी कामगारांची प्रथा रद्द केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

राज्यातील भाजप नेते कुचकामी, अंबादास दानवेंची टीका; इंडिया आघाडीचा आधार चव्हाणांकडून प्रत्युत्तर!

निवडणूक रोख्यांच्या मुद्द्यावरूनही राहुल गांधी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. ‘काँग्रेसची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. भाजपने निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून मोठ्या उद्योगपतींकडून पैसे घेतले आहेत. आगामी निवडणुका म्हणजे देशातील गरीब लोक आणि २२-२५ अब्जाधीश यांच्यातील लढाई आहे,’ असे राहुल गांधी म्हणाले.
Tamil Nadu : द्रमुक म्हणजे भ्रष्टाचार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तमिळनाडूत टीका
‘मोदी भ्रष्टाचार विद्यापीठाचे कुलगुरू’

तेनी (तमिळनाडू) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तमिळनाडूतील सत्ताधारी द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रमुक) पक्षावर केलेल्या टीकेला द्रमुकचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी गुरुवारी प्रत्युत्तर दिले. ‘जर भ्रष्टाचार विद्यापीठ स्थापन करायचे झाले, तर मोदी हे त्याचे कुलगुरू असतील. याचे कारण विचारले, तर निवडणूक रोख्यांचे प्रकरण, पीएम केअर निधी आणि भ्रष्ट नेत्यांना पक्षात घेणारे भाजप ‘वॉशिंग मशिन’ हेच त्याचे उत्तर आहे,’ असा हल्लाबोल त्यांनी केला. तेनी मतदारसंघातील द्रमुक उमेदवार थंगा तमिनसेल्वन आणि डिंडिगलचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार आर. सचिदानंदन यांच्यासाठी हाती घेतलेल्या प्रचारमोहिमेत ते बोलत होते.

Source link

Bikaner Lok Sabha ConstituencyBJP governmentCongress vs BJPcorruptionfarmersNarendra ModiRahul Gandhirahul gandhi bikaner sabhaunemploymentबिकानेर लोकसभा मतदारसंघ
Comments (0)
Add Comment