‘आघाडी सरकार साहेबांच्या मार्गदर्शनानं आलंय, आपल्याला संपूर्ण मदत होईल’

हायलाइट्स:

  • राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा पैठणमध्ये
  • जयंत पाटील यांचं कार्यकर्त्यांना समन्वयाचं आवाहन
  • जलसंपदा विभागाशी संबंधित प्रश्न मार्गी लावणार – पाटील

औरंगाबाद: राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार शरद पवार (Sharad Pawar) साहेबांच्या मार्गदर्शनानं आलं असून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी आज एकत्र सरकारमध्ये काम करत आहेत. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये समन्वय असायला हवा. सरकार म्हणून आपल्याला संपूर्ण मदत होईल,’ असं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी दिलं.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आज संत एकनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पैठण तालुक्यात पोहोचली. यावेळी पैठण विधानसभेचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला. पैठणच्या पदाधिकाऱ्यांनी जिद्दीनं व एकोप्यानं काम सुरू करायला हवं. २०१९ च्या निवडणुकीत पक्षाची परिस्थिती बिकट होती. अनेक लोक पक्षाला सोडून जात होते. मात्र, निकाल लागल्यानंतर सगळंच वातावरण बदललं. पवारसाहेबांच्या झंझावाती दौऱ्यांमुळं आपली संख्या ५४ पर्यंत गेली. पवारसाहेब जिद्दीनं लढले आणि कार्यकर्ते एक झाले म्हणून आपल्याला यश मिळालं. पैठणच्या कार्यकर्त्यांनी यातून बोध घ्यायला हवा, असा सल्ला जयंत पाटील यांनी दिला.

वाचा: BMC निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीची युती?; नीतेश राणे म्हणाले, बिचारे!

‘जलसंपदा विभागाशी संबंधित प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. येत्या काळात पैठण येथील ब्रह्मगव्हाण प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी कोणताही निधी कमी पडणार असा प्रयत्न आम्ही करू. तसंच, या भागातील इतर विकास कामांसाठी आपण प्रयत्नशील आहोत’, असं आश्वासनही त्यांनी दिलं. पैठण तालुक्यातील पर्यटनाच्या दृष्टीनं पैठण धरणाच्या पायथ्याशी असलेल्या ज्ञानेश्वर उद्यानाचं सुशोभिकरण येत्या काळात केलं जाणार आहे. या उद्यानाच्या माध्यमातून येथील युवकांना रोजगार मिळावा म्हणून जलसंपदा विभाग काम करत आहे. पैठणच्या पावित्र्याच्या उंचीचं हे उद्यान तयार करू, असं ते म्हणाले.

वाचा: संपूर्ण गावाला पडला होता पाण्याचा वेढा; ‘अशी’ निघाली अंत्ययात्रा

‘आपला पक्ष अधिक मजबूत करायचा आहे, त्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे. आपला पक्ष नेहमी जनतेसोबत राहिला आहे ही नाळ कधीही तुटू देऊ नका. एकमेकांची मनं साधण्यासाठी हा काळ वापरावा. पक्षांतर्गत संबंध चांगले राहायला हवेत. आज जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यात राष्ट्रवादीचा विजय कसा होईल हे पाहिलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला. शरद पवार साहेबांसारखं नेतृत्व पक्षाला मिळालं आहे. साहेबांनी केलेल्या झंझावाती दौर्‍यामुळे पक्षांसह आघाडीतील इतर पक्षांना मदत झाली. आता शिवसेना आपल्यासोबत आहे. त्यामुळे त्यांच्या सोबतीने आपल्याला आघाडीचे काम करायचे आहे, असंही पाटील म्हणाले.

वाचा: ‘तो’ व्हिडिओ शेअर करत राष्ट्रवादीने मोदी सरकारला डिवचले!

Source link

AurangabadJayant Patil appeal NCP WorkersJayant Patil in Paithanmaha vikas aghadiSharad Pawarऔरंगाबादजयंत पाटीलपैठणमहाविकास आघाडी
Comments (0)
Add Comment