मातोश्रींच्या बालेकिल्ल्यातून राहुल गांधी रिंगणात, अमेठी-रायबरेलीसाठी काँग्रेस उमेदवार जाहीर

नवी दिल्ली : काँग्रेस नेते आणि वायनाड लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहुल गांधी हे यंदाची लोकसभा निवडणूक उत्तर प्रदेशातील रायबरेलीमधून लढवणार आहेत. नेहरु-गांधी कुटुंबाचा बालेकिल्ला मानला जाणारा हा लोकसभा मतदारसंघ राहुल यांच्या ‘मातोश्री’ सोनिया गांधी यांनी सोडला होता. त्यानंतर राहुल गांधी येथून रिंगणार उतरणार असल्याचं पक्षातर्फे तीन मे रोजी जाहीर करण्यात आले.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून राहुल गांधींना गमवाव्या लागलेल्या अमेठी मतदारसंघातून गांधी कुटुंबाचे निष्ठावंत किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

काँग्रेसने दोन्ही जागांसाठी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असलेल्या तीन मे रोजी उमेदवारांची नावे जाहीर केली. यामुळे उमेदवारांबद्दल आठवडाभरापासून चाललेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

रायबरेली आणि अमेठी लोकसभा मतदारसंघात निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात म्हणजेच २० मे रोजी मतदान होणार आहे. राहुल गांधी यांनी २०१९ मध्ये जिंकलेल्या केरळच्या वायनाड मतदारसंघातून आधीच निवडणूक लढली आहे. वायनाडमध्ये २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात मतदान झाले होते.
आई-वडिलांची सेवा हे कर्तव्य, राम मंदिरावर मत मागणं स्वार्थीपणा, अमोल कीर्तिकर भाजपवर बरसले
भारतीय जनता पक्षाने दोन मे रोजी उत्तर प्रदेशातील मंत्री दिनेश प्रताप सिंग यांना रायबरेलीमधून उमेदवार घोषित केले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना सोनिया गांधींकडून पराभवाची धूळ चारण्यात आली होती.

१९९९ पासून २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत सलग काँग्रेस अमेठी आणि रायबरेलीची जागा जिंकत आली होती, परंतु गेल्या वेळी राहुल गांधी यांचा केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडून अमेठीत पराभव झाला. राहुल २००४ पासून अमेठीत जिंकत होते. भाजपने पुन्हा एकदा अमेठीतून इराणी यांना उमेदवारी दिली आहे.
महायुतीला पाठिंबा देताच ‘विठ्ठल’ पावला, अभिजित पाटील यांच्या साखर कारखान्याची जप्ती टळली
२००४ पासून रायबरेलीची जागा राखत आलेल्या सोनिया गांधी यांनी २०२४ मध्ये लोकसभेच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस हा समाजवादी पक्षासोबत आघाडी करून लोकसभा निवडणूक लढवत आहे. काँग्रेसला यूपीमधून ८० पैकी १७ जागा मिळाल्या आहेत तर उर्वरित जागा समाजवादी पक्ष आणि इंडिया आघाडीतील इतर मित्र पक्षांमध्ये वाटल्या गेल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या सातपैकी शेवटचा टप्पा १ जून रोजी होणार आहे. ४ जून रोजी निकाल जाहीर होणार आहेत.

Source link

AmethiKishori Lal Sharmalok sabha elections 2024raebareliRahul Gandhiअमेठीरायबरेलीराहुल गांधीसोनिया गांधी
Comments (0)
Add Comment