देशाचं नेतृत्व करणाऱ्याने रायबरेलीत उतरावं, डाव्या नेत्याने सोडवला राहुल गांधींच्या जागेचा तिढा

नवी दिल्ली : देशाचे नेतृत्व करणाऱ्यानेच उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून उभे राहावे या काँग्रेसच्या लौकिकाचा दाखला देऊन वरिष्ठ नेत्यांनीही याविषयी अनुकूलता दर्शवल्यानंतर गांधी कुटुंबीयांनी राहुल गांधी यांच्यासाठी अखेर रायबरेलीची निवड केली. विशेष म्हणजे डाव्या पक्षाच्या एका नेत्याकडूनच या तिढ्यावर मार्ग सुचविण्यात आला होता.

‘महाराष्ट्र टाइम्स’ने ‘राहुल रायबरेलीतूनच’ असे वृत्त सुमारे दोन महिन्यांपूर्वीच दिले. डाव्या पक्षांच्या एका ज्येष्ठ नेत्याने स्वतः सोनिया गांधी यांच्याकडे मांडलेले गणित या बातमीचा आधार होता. केरळमधील वायनाडमधून राहुल गांधी यांच्याविरुद्ध डावी आघाडी मैदानात उतरणार हे स्पष्ट झाले व ‘इंडिया’ आघाडीच्या एकीसाठी तसे न करण्याबाबत भाकप नेत्यांची समजूत काढणे अशक्य बनले. त्या वेळी संबंधित डाव्या पक्षनेत्याने आधी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे व नंतर स्वतः सोनिया गांधी यांच्याशीच बोलण्याचे ठरविले.

‘मटा’च्या विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, मार्चच्या सुरुवातीला ‘१०, जनपथ’ येथे दोन्ही नेत्यांत बैठक झाली, तेव्हा राहुल व त्यांचे एक निकटचे काँग्रेस नेतेही तेथे हजर होते. सुरुवातीला राहुल यांच्या या निकटवर्तीय नेत्याने रायबरेलीची कल्पना उडवून लावली; पण जेव्हा वायनाड, भाकप उमेदवार व तेथील मुस्लिम मतटक्का हे त्रैराशिक त्यांनी मांडले, तेव्हा सोनिया गांधी यांनी हा सारा प्रकार गंभीरपणे घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.
रोहित पवारांचा कट्टर समर्थक अजितदादांच्या राष्ट्रवादीत, बारामती मतदानाच्या तोंडावर जबर झटका
रायबरेली, अमेठी आणि काही प्रमाणात सुलतानपूरचा पट्टा नेहरू-गांधी घराण्यासाठी कायम महत्त्वाचा राहिलेला आहे. सोनिया गांधी यांनी लोकसभा रिंगणातून माघार घेतल्यावर या घराण्याची ही राजकीय नर्सरी उजाड होणार का, या प्रश्नाचे थेट उत्तर ‘नाही’ होते. फिरोज गांधी, इंदिरा गांधी, संजय गांधी, अरुण नेहरू, शीला कौल, विक्रम कौल, राजीव, सोनिया व राहुल गांधी अमेठी-रायबरेलीतूनच दशकानुदशके संसदेत पोहोचले. यातील अमेठी व सुलतानपूर भाजपने हिसकावून घेतल्यावर रायबरेली हा एकमेव मतदारसंघ वाचवण्याचे आव्हान काँग्रेससमोर होते. तेथे सोनिया गांधी नसतील, तर राहुल हाच पर्याय आहे, हेही डाव्या नेत्यांनी काँग्रेस नेतृत्वाला पटवून दिले.

त्यानंतर प्रियांका गांधी यांनी अखिलेश यादव यांच्याशी जुळवून घेण्याचा निर्णय प्रत्यक्षात आणला. रायबरेलीतून सोनिया गांधी सलग चार वेळा विजयी झाल्या; पण त्यांच्या मतांची टक्केवारी घसरत गेली आहे. सन २००४ मधील ८०.४९ टक्के मते, २०१९मध्ये ५५ टक्क्यांवर आली. संघटनात्मक पातळीवरही पक्षाची ही जी घसरण होत आहे, ती रोखण्यासाठी राहुल यांनीच पुढाकार घ्यावा, असे काही पक्षनेत्यांचेही मत होते.
ठाणे शिवसेनेला, गणेश नाईक शिंदेंच्या भेटीला, म्हणतात उमेदवारीची इच्छा बाळगणं गुन्हा आहे का?
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

… तर प्रियांका यांना अमेठी?

निवडणुकीनंतर राहुल यांना एक जागा सोडायची असेल, तर प्रियांका यांना रायबरेलीतून उमेदवारी द्यावी. कारण तोपर्यंत निवडणुकीत ‘इंडिया’ आघाडी आणि काँग्रेसची स्थिती काय आहे हेदेखील स्पष्ट झालेले असेल. हा मुद्दा राहुल व सोनिया यांना पटवून देण्यात यश आले. गेल्या पाच वर्षांत राहुल यांनी अमेठीला फक्त दोन-तीनदा भेट दिली होती. त्यांचा युक्तिवाद असा होता, की जेव्हा अमेठीच्या लोकांनी त्यांचा हात सोडला, तेव्हा वायनाडच्या मतदारांनी त्यांना पाठिंबा दिला होता. यंदा ते समजा जिंकले, तरी ते अमेठीची जागा सोडतील. या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला कोणताही धोका पत्करायचा नव्हता. त्यामुळे पलायनाचा आरोप होणार हे माहिती असूनही पक्षाने राहुल गांधी यांच्यासाठी अमेठीऐवजी रायबरेलीची जागा पक्की केली.

Source link

Amethilok sabha elections 2024Rahul GandhiRahul Gandhi ConstituencyRaibareliuttar pradeshउत्तर प्रदेशरायबरेलीराहुल गांधीलोकसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment