चारधाम यात्रेला जाण्यापूर्वी लक्षात ठेवा नवा हा नियम, प्रशासनाने उचलले मोठे पाऊल, जाणून घ्या

Char Dham Yatra: चार धाम यात्रेकरूंसाठी उत्तराखंड सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तुम्हीही चारधाम यात्रेला निघाला असाल तर ही बातमी नक्की वाचणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. चार धाम केदारनाथ, बद्रीनाथ, यमुनोत्री आणि गंगोत्री यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंना आता VIP दर्शनाला परवानगी नसल्याच्या सांगण्यात आले आहे. सरकारने व्हीआयपी दर्शनावर बंदी घातली आहे. ही बंदी सध्या 31 मे पर्यंत लागू करण्यात आली आहे. याशिवाय चार धामसाठी प्रशासनाने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.

भाविकांना होतो त्रास

चार धाम यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने येत असल्याचे चित्र आहे. 10 मे पासून यात्रा सुरू झाल्यापासून लाखोंच्या संख्येने लोक दर्शनासाठी पोहोचत असल्याने इतर लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. चार धाम येथे लोकांची गर्दी वाढत आहे. त्यांच्यामध्ये व्हिडिओग्राफी किंवा इंस्टाग्राम रील्स बनवण्यासाठी मोठ्या संख्येने तरुण तेथे येत आहेत. त्यामुळे त्यांच्या दर्शनासाठी इतर लोक एकाच ठिकाणी जमतात, त्यामुळे इतर भाविकांना त्रास होतो.

अशा स्थितीत चार धाम मंदिरांजवळ 200 मीटरच्या परिसरात रिल बनवण्यास परवानगी दिली जाणार नाही, अशा सूचना प्रशासनाने जारी केल्या आहेत. याचा अर्थ आता येथे VIP दर्शन आणि व्हिडिओग्राफीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. हरिद्वार आणि ऋषिकेशमध्ये ऑफलाइन नोंदणी १९ मेपर्यंत बंद करण्यात आली आहे.

आठवडाभरातच 10 लाख भाविकांची भेट

10 मे पासून चारधाम यात्रेला सुरुवात झाली. पहिल्या 6 दिवसांतच विदेशी पर्यटकांसह 3 लाखांहून अधिक लोक दर्शनासाठी चारधामला पोहोचले. यात्रेसाठी 25 एप्रिलपासून नोंदणी सुरू झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गुरुवारपर्यंत यात्रेसाठी 27 लाख भाविकांनी नोंदणी केली होती. एवढा मोठा जनसमुदाय तेथे पोहोचल्याने प्रशासनालाही यात्रेकरूंचे नियोजन करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे सध्या नोंदणी थांबवण्यात आली आहे.

90 टक्के लोक केवळ मौजमजेसाठी देतात भेट

गुजरातच्या नौसारी येथून आलेल्या मिहीर पटेल यांनी सांगितले की, गर्दी खूप आहे. यामुळे काही अडचणी येत आहेत. जादा वाहनांमुळे वाहतूक कोंडी होते. दोन ते तीन तासांच्या रांगेनंतर दर्शन घेता येते. बहुतेक समस्या तिथे मौजमजा करणाऱ्या लोकांमुळे होतात. काही लोक तर चक्क ड्रग्ज घेत आहेत. ते रील बनवण्यासाठी भाविकांना त्रास देत आहेत. 10 टक्के लोक फक्त मौजमजेसाठी येतात. 10 टक्के लोक भक्तीसाठी येतात. या सर्व कारणांमुळे भाविकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे मिहीर यांनी सांगितले आहे.

Source link

badrinath templechar dham yatrachar dham yatra latest newschar dham yatra latest news marathichar dham yatra newskedarnath yatra
Comments (0)
Add Comment