राहुल गांधी सकाळच्या सुमारास राजधानी दिल्लीतून लखनऊ विमानतळावर दाखल झाले आणि पायी प्रवास करत रायबरेली गाठले. यावेळी त्यांनी काही मतदान केंद्रांची तपासणी केली आणि मतदारांशी संवाद देखील साधला. गांधी घराण्यातील सोनिया गांधी यांनी आतापर्यंत रायबरेली मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केले होते. आता राहुल गांधीच्या माध्यमातून काँग्रेस आपला गड राखण्यात यश मिळवेल का?, हे पाहावे लागेल.
उत्तरप्रदेशात पाचव्या टप्प्यात मोहनलाल गंज, लखनऊ, रायबरेली, अमेठी, जलौन, झांसी, हमीरपूर, बांदा, फतेहपूर, कौशंबी, बाराबांकी, फैझाबाद, कैसरगंज आणि गोंदा या तेरा मतदारसंघांमध्ये मतदानप्रक्रिया पार पडत आहे. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड मतदारसंघातून देखील निवडणूक लढत आहेत.
दरम्यान राहुल गांधी यांनी ‘एक्स’वर पोस्ट लिहत मतदारांना भारताच्या प्रगतीसाठी मतदान करण्याचे आवाहन केले आहे. ते लिहतात,