कबीरधाम: छत्तीसगढच्या कबीरधाम जिल्ह्यातील बहपनी गावात आज (२०मे) दुपारी बारा वाजेच्या सुमारास पिकअप हे वाहन ३० फुट खोल खड्ड्यात पडले. या दुर्घटनेत तब्बल १८ जणांचा मृत्यू झाला तर ७ जण गंभीर जखमी आहेत. पंडारिया ब्लॉक अंतर्गत कुकदूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिकअपमध्ये बसलेले लोक सेमहरा (कुई) गावचे रहिवासी असून ते तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेले होते. ज्या रस्त्यावर हा अपघात झाला तो रस्ता प्रधानमंत्री सडक योजनेतंर्गत तयार करण्यात आला आहे. घटनास्थळ हे दुर्गम जंगल आणि डोंगराळ भागात येते. तसेच आजूबाजूच्या परिसरात मोबाईल नेटवर्क देखील काम करत नाही. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिकअपमध्ये बसलेले लोक सेमहरा (कुई) गावचे रहिवासी असून ते तेंदूपत्ता तोडण्यासाठी गेले होते. ज्या रस्त्यावर हा अपघात झाला तो रस्ता प्रधानमंत्री सडक योजनेतंर्गत तयार करण्यात आला आहे. घटनास्थळ हे दुर्गम जंगल आणि डोंगराळ भागात येते. तसेच आजूबाजूच्या परिसरात मोबाईल नेटवर्क देखील काम करत नाही. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांच्याकडून शोक व्यक्त
छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णुदेव साई यांनी घडलेल्या अपघाताबद्दल शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की,”कबीरधाम जिल्ह्यातील कुकदूर पोलीस स्टेशन हद्दीतील बहपनी गावाजवळ पिकअप उलटल्याने १८ जणांचा मृत्यू आणि ७ जण जखमी झाल्याची दुःखद बातमी मिळत आहे. जखमींवर उत्तम उपचार व्हावेत यासाठी आवश्यक त्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या आत्म्यांना शांती लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. तसेच जखमी व्यक्ती लवकरात लवकर बरे व्हावे यासाठी मी प्रार्थना करतो.’