Vastu Tips : घरात सतत नवरा-बायकोची भांडण होताय? असू शकतो वास्तुदोष, वेळीच हे उपाय करा

वास्तुशास्त्र नियम :

नवरा-बायकोच नातं हे अनेक नात्यांपेक्षा सुंदर मानलं जाते. आपलं नातं घट्ट आणि आनंदी ठेवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास आपल्याला अनेक समस्यांचा सामना करावा लागतो.

वास्तुशास्त्रानुसार घरात वारंवार कलह होत असेल, मुलं आजारी पडत असतील, पैशांची कमतरता भासत असेल तर आपल्याला काही गोष्टींकडे प्रकर्षाने लक्ष द्यायला हवे.
Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार हे नियम लक्षात ठेवा! आर्थिक चणचण होईल कमी
फेंगशुईनुसार घरातील दिशेला अधिक महत्त्व आहे. जर बेडरुममध्ये काही गोष्टी चुकीच्या दिशेला ठेवल्यातर त्यांचा परिणाम नात्यावर होतो असे म्हटले जाते. तसेच काही नकारात्मक गोष्टींनाही सामोरे जावे लागते. जर तुम्हाला घराची आर्थिक स्थिती सुधरवायची असेल, नवरा-बायकोमधील भांडण थांबवायची असेल किंवा आरोग्य सांभाळ्याचे असेल तर वास्तुशास्त्रातील हे नियम कायम लक्षात ठेवा.

1. वास्तुदोष दूर करण्यासाठी उपाय

घरात कोणत्याही प्रकारचा वास्तुदोष असेल तर आपल्या कुटुंबाला त्रास होतो. आपण कोणतेही काम करु शकत नाही. तसेच घरात शुभ कार्य करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यश मिळत नाही. नवरा-बायकोच्या नात्यात दूरावा येतो. घरात दु:ख, त्रास यासारख्या समस्या सतत येत राहातात. या सर्वांपासून मुक्ती मिळवण्यासाठी संध्याकाळच्या वेळी गुगळ, पिवळी मोहरी, शुद्ध गाईचे तूप आणि लोभान एकत्र करुन जाळावे. असे २१ दिवस केल्याने घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाईल. त्यामुळे वास्तुदोष दूर होण्यास मदत होईल.
Vastu Tips : खाण्यापिण्याचा बिझनेस सुरु करताय? दुकानात या दिशेला ठेवा पैशांचा गल्ला, धनात होईल वाढ!

2. ग्रहांच्या त्रासापासून मुक्ती

जेव्हा ग्रहांचे संक्रमण होते तेव्हा त्याचा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम सगळ्यात जास्त नात्यांवर होतो. यामुळे पती- पत्नींमध्ये वाद होतात. ग्रहांच्या समस्येपासून मुक्तता मिळवण्यासाठी गाईच्या शेणाच्या गौरीमध्ये गुगळ टाकून ते जाळून त्याचा धूप घरभर पसरवा. यामुळे घरातील नकारात्मक दूर होईल.

3. आरोग्य बिघडणे

घरातील माणसांचे आरोग्य सतत खराब होत असेल किंवा छोटी-मोठी दुखणी उद्भवत असतील तर गुगळ आणि धूप फायदेशीर ठरतात. यासाठी घरात गुगळ उदबत्ती लावा. हे आरोग्यासाठी चांगले ठरेल. घरातील वातावरण शुद्ध आणि सुगंधी राहिल. मानसिक थकवाही दूर होईल. मनाला शांतीचा अनुभव येतो.

टीप : ही सर्व माहिती भाविकांची श्रद्धा लक्षात घेऊन दिली जात आहे, तुमच्या श्रद्धा आणि विश्वासावर ज्योतिष उपाय आणि सल्ला वापरून पाहा. याचा उद्देश फक्त तुम्हाला चांगला सल्ला देणे आहे. या संदर्भात आम्ही कोणताही दावा करत नाही.

Source link

Vastu RulesVastu TipsVastu Tips For Husband-Wife RelationVastu Tips For SuccessVastu Tips For Wealthवास्तु टीप्सवास्तुचे नियमवास्तुशास्त्र
Comments (0)
Add Comment