मतदान प्रक्रियेनंतर आता देशाचे एक्झिट पोलकडे लक्ष; पण तुम्हाला माहित आहे का exit poll म्हणजे काय?

नवी दिल्ली : लोकसभेची निवडणूक लवकरच सात टप्प्यांत पूर्ण होणार आहे. निवडणूक संपल्यानंतर सर्वांची नजर ४ जूनच्या निकालावर असणार आहे. निकालाआधीच काही एक्झिट पोल काढले जातात. ज्यात कोणता पक्ष या निवडणुकीत जिंकणार याबद्दल सांगितले जाते. अनेकवेळा एक्झिट पोलचा निकाल आणि निवडणुकीचा निकाल सारखाच असतो. तसेच कधी-कधी निकाल हा अगदी विरुद्धही असतो. यामुळेच काही लोक एक्झिट पोलवर विश्वास करतात तर काही लोक यावर विश्वास ठेवत नाहीत. एक्झिट पोल म्हणजे नक्की असते तरी काय? आणि याच्यावरुन निवडणुकीचा निकाल कशापद्धतीने काढला जातो हे जाणून घ्या.

एक्झिट पोल केव्हा काढले जातात?

मतदानाच्या वेळी मतदान केंद्राच्या बाहेरील मतदारांना विचारले जाते की, त्यांनी कोणत्या पक्षाला किंवा कोणत्या उमेदवाराला मत दिले आहे. अशापद्धतीने मिळालेल्या आकड्याचे विश्लेषण करुन निवडणुकीचे निकाल काय असतील याचे निष्कर्ष काढले जातात. उदाहरणार्थ, एका निवडणुकीचे दोन टप्पे असतील तर एक्झिट पोल दुसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर काढले जातात. काहीवेळेस पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर ही एक्झिट पोल काढले जाते. उदाहरणार्थ, जर निवडणूक दोन टप्प्यांत असेल आणि पहिल्या टप्प्यात कमी प्रमाणात मतदान झाले असेल तर एक्झिट पोलवरुन दुसऱ्या टप्प्यातील निकालाचा निष्कर्ष काढण्यास मदत मिळते.

Lok Sabha Elections 2024: सहाव्या टप्प्यासाठी उद्या मतदान, ५८ जागांसाठी ८८९ उमेदवार रिंगणात

सर्वात पहिले एक्झिट पोल कुठे व केव्हा सुरु करण्यात आले?

सर्वात पहिले एक्झिट पोल १९३६ रोजी अमेरिकेत झाले होते. जॉर्ज गैलप आणि क्लॉड रोबिंसन यांनी न्यूयॉर्क शहरात एक निवडणुकीचे सर्वेक्षण केले. ज्यात मतदान करुन आलेल्या मतदारांना विचारण्यात आले की, त्यांनी राष्ट्रपती पदासाठी कोणत्या उमेदवाराला मत दिले आहे. अशापद्धतीने जे काही आकडे मिळाले त्याचे विश्लेषण करून हा निष्कर्ष काढण्यात आला की, फ्रैंकलिन डी. रूजवेल्ट हे निवडणूक जिंकणार. रूजवेल्ट हे प्रत्यक्षात निवडणूक जिंकले, एक्झिट पोलच्या निकालामुळे निवडणुकीतील निकालावर प्रभाव टाकला. यानंतर, एक्झिट पोल अनेक देशांत लोकप्रिय झाले. १७३७ साली ब्रिटेनमध्ये पहिले एक्झिट पोल झाले. १९३८ मध्ये फ्रांसमध्ये पहिले एक्झिट पोल झाले.

भारतात सर्वात पहिले एक्झिट पोल कधी केले?

भारतात एक्झिट पोलची सुरुवात १९९६ मध्ये झाली. याची सुरुवात सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेवलपिंग सोसायटीज (CSDS) या संस्थेने केली होती. या एक्झिट पोलमध्ये निष्कर्ष काढण्यात आला की भारतीय जनता पार्टी लोकसभेची निवडणूक जिंकणार. प्रत्यक्षात भारतीय जनता पार्टीने निवडणूक जिंकली तेव्हापासून भारतात एक्झिट पोलला चालना मिळाली. १९९८ मध्ये पहिल्यांदा एका खासगी वृत्तवाहिनीने एक्झिट पोलचे प्रसारण केले. आता भारतात वेगवेगळ्या एजंसीद्वारे अनेक एक्झिट पोल काढण्यात येतात.

मतदानानंतर मतदारांची संख्या ७ कोटींनी वाढली, निवडणूक आयोगाच्या ‘वाढीव कारभारावर’ सर्वोच्च न्यायालयात याचिका

एक्झिट पोल ओपिनियन पोलपेक्षा कसे वेगळे आहे?

एक्झिट पोल मतदानादिवशी केले जाते. मतदान करुन बाहेर आलेल्या मतदारांना विचारले जाते की, त्यांनी कोणत्या पक्षाला किंवा उमेदवाराला मत दिले आहे. अशापद्धतीने मिळालेल्या आकड्यांचे विश्लेषण करुन निष्कर्ष लावण्यात येतो की निवडणुकीचा निकाल काय असेल.

ओपिनियन पोल निवडणुकीआधी काढले जाते. यात सर्वांचा समावेश असतो, जरी मतदार नसला तरी. यामध्ये कोणत्या पक्षाला किंवा उमेदवाराला तुम्ही मत देण्याचा विचार करत आहात, असे लोकांना विचारण्यात येते. एक्झिट पोल आणि ओपिनियन पोल हे दोन्ही उपयोगी साधन असू शकतात, पण यावर काही मर्यादासुद्धा आहेत. एक्झिट पोल नेहमी बरोबरच असतील असे नाही, कारण मतदार मतदान दिल्यानंतर आपली मत बदलू शकतो. ओपिनियन पोल सुद्धा चुकीचे ठरु शकतात कारण मतदार निवडणुकीआधी आपले मत बदलू शकतो.

Election Commission : बूथनिहाय मतदानाची आकडेवारी जाहीर करण्यात अडचण काय? सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल

एक्झिट पोलसाठी काय नियम आहेत?

भारतात निवडणूक आयोगाने एक्झिट पोलसाठी काही नियम बनवले आहेत. या नियमांचा उद्देश मतदारांची फसवणूक किंवा निवडणुक प्रकियेवर प्रभाव टाकण्यापासून रोखण्याचा आहे.
एक्झिट पोलमधील आलेला निकाल मतदानादिवशी प्रसारित केला जाऊ नये.
एक्झिट पोलचा निकाल मतदानानंतर प्रसारित करण्यासाठी सर्वेक्षण एजंसीने निवडणूक आयोगाची परवानगी घेणे गरजेचे आहे.
एक्झिट पोलचा निकाल प्रसारित करत असताना, सर्वेक्षण एजंसीने हे आधीच स्पष्ट केले पाहिजे, की हा फक्त अंदाज लावलेला आहे.

भारतात कितपत एक्झिट पोल अचूक आहे?

भारतात एक्झिट पोलची अचूकता ८० ते ९० टक्के आहे. काहीवेळेस एक्झिट पोल अचूक असतीलच असे नव्हे. उदाहरणार्थ, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत एक्झिट पोलवर अंदाज लावण्यात आला होता की, भारतीय जनता पार्टी ३०० जागांपैकी २८० जागा जिंकतील. पण प्रत्यक्षात भारतीय जनता पार्टीने २८२ जागा जिंकल्या होत्या. एक्झिट पोल एक महत्त्वाचे साधण आहे पण हे लक्षात ठेवले पाहिजे की एक्झिट पोल नेहमी अचूकच असेल.

Source link

election commission of indiaexit pollexit polls resultsloksabha election 2024loksabha election 2024 votingopinion pollएक्झिट पोलओपिनियन पोलनिवडणूक आयोगलोकसभा निवडणूक २०२४
Comments (0)
Add Comment