एखाद-दुसऱ्या राज्यातच मतदानाच्या टक्केवारीत घसरण झाली, असं नाही. तर जवळपास प्रत्येक राज्यातच मतदानाची टक्केवारी कमी झाली आहे. उदाहरणार्थ, केरळच्या सर्व २० जागांवर मतदानाच्या टक्केवारीत घट पाहायला मिळत आहे. त्यापैकी १२ जागांवर २०१९ च्या तुलनेत मतांची संख्याही कमी आहे. तर उत्तराखंडमध्ये पाच जागांवरील मतदान कमी झाले आहे.
राजस्थान आणि तमिळनाडूत जवळपास अर्ध्या जागांवर मतदारांच्या संख्येत घट आहे. तर ९० टक्के जागांवर कमी मतदानाची टक्केवारी नोंदवली गेली आहे. उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या भाजपप्रणित राज्यांत तीन चतुर्थांश जागांवर मतदान (टक्केवारी) घटले आहे. मात्र एक तृतीयांश जागांवर २०१९ च्या तुलनेत कमी मतांची नोंद झाली, ही त्यातल्या त्यात दिलाशाची बाब.
गुजरातमध्ये २०१९ च्या तुलनेत २५ टक्के जागांवर कमी मतदान झाले. त्याचप्रमाणे, बिहारमध्ये, २०१९ च्या तुलनेत २४ पैकी २१ जागांवर कमी मतदान झाले, परंतु केवळ एकाच जागेवर मतांची संख्या कमी झाली. महाराष्ट्रात ४८ पैकी २० जागांवर मतदानाची टक्केवारी कमी झाली, मात्र केवळ सहा जागांवर मतांची संख्या कमी झाली.
देशभरातील ज्या ४०९ जागांचं विश्लेषण केलं जात आहे, त्यापैकी ज्या सहा जागांवर २०१९ च्या तुलनेत कमी मतदारांची नोंद झाली, त्यापैकी पाच केवळ महाराष्ट्रातल्या जागा आहेत. त्यात दक्षिण मुंबई आणि पुणे या जागांचा प्रामुख्याने समावेश आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
यावेळी आंध्र प्रदेश, झारखंड, कर्नाटक, ओडिशा, तेलंगणा आणि पश्चिम बंगालमध्ये २०१९ च्या तुलनेत मतांची टक्केवारी घटलेली एकही जागा नाही. मात्र, काही ठिकाणी कमी मतदान झाले. छत्तीसगढ हे एकमेव मोठे राज्य होते, ज्यात प्रत्येक जागेवरील मतदान आणि संपूर्ण मतांची संख्या – दोन्ही जास्त होती.