Lok Sabha Election : भाजपला नुकसान होणार, इंडिया आघाडीच्या जागा वाढणार योगेंद्र यादवांची भविष्यवाणी

मुंबई : लोकसभा निवडणुकीचे मतदान अंतिम टप्प्यात आले आहे, यादरम्यान राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी भाजपला ३०० जागा मिळणे कठीण आहे असा दावा केलाय. लोकसभेसाठी भाजपचा चारशे पारचा नार ठरलाय, पण योगेंद्र यादव यांनी भाजप ४०० चा आकडा गाठणे कठीण असे भाकित केलंय. ऐन सातव्या टप्प्यातील निवडणुकांच्या तोंडावर यादवांनी केलेल्या दाव्यांमुळे भाजपचे टेन्शन वाढण्याची शक्यता आहे. लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी सुद्धा लोकसभा निकालाबाबत अंदाज वर्तवला होता त्यांच्यामते भाजप आरामात ३०० च्या पार जाईल आणि पुन्हा केंद्रात सत्तेत येईल असा त्यांना अंदाज बोलून दाखवला आहे.

भाजपला किती नुकसान होणार?

योगेंद्र यादव यांच्या दाव्यानुसार सातव्या टप्प्यात बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये भाजपला नुकसान होवू शकते. सत्तास्थापनेसाठी लागणाऱ्या २७२ जागांपेक्षाही कमी जागांवर भाजपला यश मिळेल अशी शक्यता यादवांनी वर्तवलीय. भाजपच्या मित्रपक्षांना ३५ ते ४५ जागांवर यश मिळेल तर भाजप साधारण २४० ते २६० जागांवर जिंकेल असा दावा यादवांनी केला आहे. तर दक्षिणातील राज्यातून भाजपला दोन ते चार जागांची वाढ होवू शकते असा अंदाज यादवांनी बोलून दाखवलाय. २०१९ मध्ये भाजपला ३०३ जागांवर यश मिळाले होते पण आता त्याहून अधिक भाजपने चारशे पारचा नारा दिलाय.
मोदी पुन्हा ३०० जागा जिंकून सत्तेत येतील, राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी

काँग्रेसला किती जागांवर फायदा होणार?

इंडिया आघाडी म्हणून एकजूट असलेल्या विरोधकांना साधारण २०० ते २३५ जागांवर यश मिळेल अशा यादवांना अंदाज आहे. काँग्रेस एकटे साधारण ७० ते १०० जागांवर जिंकून येईल असा विश्वास यादवांनी बोलून दाखवलाय तर काँग्रेससोबत गेलेले मित्रपक्ष १२५ ते १३५ जागांवर जिंकून येण्याची शक्यता यादवांनी बोलून दाखवलीय. साधारण काँग्रेस आणि मित्रपक्ष भाजपला काटे की टक्कर देवू शकतात असा अंदाज यादवांना वाटतोय.

महाराष्ट्रात नेमके गणित काय?

राज्यात सध्या महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगलेला दिसतोय. पाच टप्प्यात झालेल्या मतदानात मतदारांचा मतदानांसाठी प्रतिसाद मात्र अल्प पाहायला मिळालाय. मागील लोकसभा निवडणुकीत भाजपला आणि सेना मिळून साधारण ४२ जागांवर यश मिळाले होते पण यंदा धक्कादायक निकाल येवू शकतो असा अंदाज यादवांनी बोलून दाखवलाय. यंदा भाजपला साधारण १५ जागांवर नुकसान होईल म्हणजेच ठाकरेंची सेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या बाजूने जास्त जागा जाण्याची शक्यता आहे.

Source link

bjpindia allianceloksabha electionPrashant KishorYogendra Yadavयोगेंद्र यादवलोकसभा निवडणुक
Comments (0)
Add Comment