परमात्म्याच्या भेटीला जातोय! चिठ्ठी लिहून मुलगी मैत्रिणींसह बेपत्ता; तिघींचं पुढे काय झालं?

पाटणा: बिहारच्या मुझफ्फरपूरमधून १३ मे रोजी तीन मुली एकाचवेळी बेपत्ता झाल्या. तीन मैत्रिणींनी ट्रेनसमोर आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. यातील एका मुलीनं घरात एक चिठ्ठी ठेवली होती. आम्ही परमात्म्याच्या भेटीसाठी जातोय. आम्हाला शोधण्याची गरज नाही, असं तिनं चिठ्ठीत लिहिलं होतं. उत्तर प्रदेशातील मथुरेत तिघींचे मृतदेह सापडले असून पोलीस या प्रकरणाचं गूढ उकलण्याच्या प्रयत्नात आहेत.

आम्हाला बाबांनी बोलावलंय. आम्ही हिमालयात जातोय. शोधण्याचा प्रयत्न केलात तर मी विष प्राशन करेन. आम्ही विषदेखील खरेदी केलंय, असं मुलीनं चिठ्ठीत नमूद केलं होतं. १३ मे रोजी मुझफ्फरपूरच्या योगीया मठ परिसरात राहणाऱ्या ३ मुली अचानक बेपत्ता झाल्या. त्यामुळे कुटुंबीय चिंतेत होते. मुली बेपत्ता झाल्याच्या १० दिवसांनंतर पोलिसांनी एफआयआर नोंदवून तपास सुरु केला. मुलींच्या मोबाईलचं लोकेशन उत्तर प्रदेशात सापडलं.
तरुणाला असह्य वेदना; पोटातून निघाले १० खिळे, १ किल्ली, नट बोल्ट अन् ८ सुया; डॉक्टर चकित
यानंतर २६ मे रोजी उत्तर प्रदेशच्या मथुरेतील बाजना पुलाजवळील रेल्वे रुळांवर तीन मुलींचे मृतदेह सापडले. तिघींच्या हातांवर मेहंदी होती. पैकी एकीच्या हातावर मेहंदीनं SGB लिहिलेलं होतं. त्यांच्या कपड्यांवर मुझफ्फरपूरच्या टेलरचा टॅग सापडला. या तीन मुली बिहारच्या असाव्यात असा अंदाज पोलिसांनी बांधला. त्यानंतर मुझफ्फरपूर पोलिसांचं एक पथक मथुरेला गेलं. त्यांनी तपास केला.
Loksabha Election 2024: ८ ते १० जागांवर उमेदवारांची निवड चुकली? महायुतीची धाकधूक वाढली; ‘ते’ प्रयोग फसण्याची भीती
बेपत्ता झालेल्या तीन मुलींच्या कुटुंबियांना मृतदेह दाखवण्यात आले. पैकी दोन कुटुंबियांनी मृतदेह ओळखले. पण तिसऱ्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. एका मुलीची ओळख चेहऱ्यावरुन, तर दुसरीची ओळख कपड्यांवरुन पटली. तिसऱ्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. हा मृतदेह महिलेचा असल्याचं तिसऱ्या मुलीच्या कुटुंबियांनी सांगितलं.

Source link

Biharsuicidethree girls found deaduttar pradeshउत्तर प्रदेशतिघींचा मृत्यूबिहारमृतदेह
Comments (0)
Add Comment