Narendra Modi : निवडणुकीचा प्रचार संपताच नरेंद्र मोदींची ‘या’ ठिकाणी ध्यानधारणा, विरोधकांची जोरदार टीका

वृत्तसंस्था, कन्याकुमारी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कन्याकुमारी येथील विवेकानंद रॉक मेमोरियल येथील मुक्कामासाठी कडेकोट सुरक्षेसह सर्व व्यवस्था सज्ज करण्यात आली आहे. जिल्ह्यात दोन हजार पोलिस कर्मचारी आणि विविध सुरक्षा यंत्रणांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यासाठीचा प्रचार संपल्यानंतर, पंतप्रधान मोदी येथे ४५ तास ध्यानधारणा करणार आहेत.२०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारानंतर मोदी हे केदारनाथ येथील गुहेत ध्यानधारणा करण्यासाठी गेले होते. पाच वर्षांनंतर, त्यांनी देशाच्या दक्षिण टोकाला असलेल्या कन्याकुमारीची निवड केली आहे. ३० मे रोजी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा समारोप झाल्यानंतर ते कन्याकुमारी येथे दाखल होतील. स्वामी विवेकानंद यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उभारण्यात आलेल्या रॉक मेमोरियल येथील ध्यान मंडपम येथे ३० मे राजी संध्याकाळपासून ते एक जूनला दुपारी तीन वाजेपर्यंत पंतप्रधान मोदी ध्यानधारणा करतील, असे भाजप नेत्यांकडून सांगण्यात आले होते. विवेकानंदांना याच ठिकाणी ‘भारत माते’विषयी दिव्य दृष्टी प्राप्त झाली होती, असे मानले जाते.

Pune News : स्मार्ट मीटरच्या खर्चाची भरपाई ग्राहकांच्याच खिशातून? महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेने आरोप
पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर, येथे सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तिरुनेलवेल्लीचे पोलिस महानिरीक्षक प्रवेशकुमार, पोलिस अधीक्षक ई. सुंदरावथनम यांनी रॉक मेमोरियल, जेट्टी, हेलिपॅड; तसेच कन्याकुमारी येथील सरकारी अतिथिगृहाची पाहणी केली. पंतप्रधानांचे सुरक्षा पथक याआधीच येथे दाखल झाले आहे. हेलिपॅडवर हेलिकॉप्टर उतरवण्याचीही चाचणी करण्यात आली आहे. सागरी सुरक्षा चोख ठेवण्यात आली आहे. तटरक्षक दल आणि नौदलातर्फे सागरी सीमांवर गस्त घातली जाईल. या कालावधीत विवेकानंद स्मारक व तिरूवल्लुवर स्मारकाचे परिसर पर्यटकांसाठी पूर्णपणे बंद राहणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हिंदी महासागर, बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्र या तीन समुद्रांचा संगम असलेले कन्याकुमारी हे आंतरराष्ट्रीय पातळीवरील लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. पंतप्रधानांनी तमिळनाडूला यावर्षी अनेकदा भेट दिली असून धनुष्कोडीसारख्या तीर्थक्षेत्रालाही त्यांनी भेट दिली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या व अखेरच्या टप्प्याचा प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारपासून (३० मे) दोन दिवस तमिळनाडूतील कन्याकुमारीजवळ समुद्रातील विवेकानंद स्मारक परिसरात ध्यानमग्न होणार आहेत. त्यांची ही प्रस्तावित ध्यानधारणा सुरू होण्यापूर्वीच विरोधकांच्या टीकेचा विषय बनली आहे. ‘मोदीजी, या वेळी कॅमेरा बरोबर न घेता ध्यानाला जा’ असा टोला राष्ट्रीय जनता दलाने लगावला, तर काँग्रेसने याची संभावना नाटकबाजी अशी केली.

‘मोदी प्रायश्चित्त घेत असतील, तर चांगलेच आहे’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कन्याकुमारी येथील ध्यानधारणेच्या कार्यक्रमावर विरोधी नेत्यांनी मात्र टीकास्त्र सोडले आहे. ‘ज्या व्यक्तीला विवेक या शब्दाचा अर्थ समजत नाही, ते ध्यान काय करणार? जर ते प्रायश्चित्त घेणार असतील, तर चांगले आहे. किंवा ते स्वामी विवेकानंद यांच्या लेखनातून प्रेरणा घेणार असतील, तरीही चांगले आहे,’ अशी टीका राज्यसभेचे खासदार कपिल सिब्बल यांनी केली.

Source link

lok sabha election campaignloksabha election 2024modi in kanyakumariNarendra Modi TOPICpm modi kanyakumari visitpm modi speechVivekananda Rock Memorialपंतप्रधान नरेंद्र मोदी TOPICलोकसभा निवडणुक २०२४ बातमीविवेकानंद रॉक मेमोरियल
Comments (0)
Add Comment