Fact Check : सत्तापालट होणार इंडिया आघाडी जिंकणार? व्हायरल पोस्टचे सत्य काय

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत सगळ्याच वृत्तवाहिन्यांनी लोकसभेचा निवडणुकीचा सर्व्हे जाहीर केला आणि कोणत्या पक्षाला किती संभाव्य जागा मिळू शकतात याची शक्यता वर्तवली पण आता याच संदर्भातील एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये इंडिया आघाडीला बहुमत मिळेल असा दावा करण्यात आहे पण विश्वास न्यूजच्या पडताळणीत ही पोस्ट खोटी निघाली.

व्हायरल पोस्टमध्ये काय दावा करण्यात येतोय?
लोकसभेच्या निवडणुकीत इंडिया आघाडी बहुमताचा आकडा गाठेल. साधारण २५८ ते २८६ जागांवर इंडिया आघाडीला यश मिळेत तर उर्वरित २३२ ते २५३ जागांवर भाजपला यश मिळेल असा दावा पोस्टमध्ये करण्यात येतोय. यासह उत्तर पूर्व दिल्लीतून मनोज तिवारींला सुद्धा कमी मत मिळणार असा सुद्धा दावा पोस्टमध्ये आहे.

व्हायरल पोस्टचे सत्य काय?
विश्वास न्यूजच्या पडताळणीत व्हायरल झालेली पोस्ट फेक असल्याचे स्पष्ट झाले. व्हायरल होत असलेली पोस्ट एडिट टूल वापरुन फेक बनवली असे समोर येत आहे. खऱ्या सर्व्हेमध्ये इंडिया आघाडीला १६५ ते २०५ जागांवर यश मिळेल अशी शक्यता वर्तवली आहे. तर भाजप आणि मित्रपक्षाला २९५ जागांवर यश मिळेल अशी शक्यता वर्तवली आहे. फेसबुक युजर्स शिवा चिल्ली ने २८ मे २०२४ ला व्हायरल स्क्रीनशॉट शेअर करत कॅप्शन दिले आहे की “या वृत्तवाहिनीने खुले आम इंडिया आघाडीचे सरकार स्थापन केलंय” पोस्टची आर्काइव लिंक इथे पाहू शकता.

Fact Check : RSS स्वयंसेवकाची मशिदीत निर्घृण हत्या, ‘त्या’ व्हिडिओचे नेमके सत्य काय?

पडताळणीत सत्य आले समोर
व्हायरल पोस्टचा स्क्रीनशॉट जवळून पाहिली तर फोटोवर वृत्तवाहिनीचा लोगो दिसतोय मग त्या वृत्तवाहिनीवरील युट्यूबचे आणखी व्हिडिओ पाहिले असता असे समोर आले की व्हायरल झालेल्या पोस्टचा खरा व्हिडिओ डिंसेबर २०२३ मध्ये अपलोड करण्यात आलाय व्हिडिओची अर्काइव लिंक.

व्हिडिओमध्ये सी व्होटरनुसार आकडेवारी सांगण्यात आली आहे. ज्यामध्ये इंडिया आघाडीला १६५ ते २०५ जागांचा आकडा आणि भाजप मित्रपक्षांना २९५ ते ३३५ चा आकडा सांगण्यात आला तसेच मनोज तिवारी यांना सुद्धा दिल्लीतून मतांची चागंली आघाडी मिळेल असा अंदाज मांडण्यात आला आहे.

विश्वास न्यूजच्या तपासणीत त्यांना वृत्तवाहिनीची पोस्ट सुद्धा मिळाली ज्यामध्ये त्यांनी स्वत व्हायरल पोस्ट टाकून ही बातमी खोटी पसरवले जात आहे असे सांगून त्यांनी त्या व्हायरल पोस्टचे खंडन केले होते. निवडणुक आयोगाच्या वेबसाईटवर (आर्काइव लिंक) असलेल्या माहितीनुसार लोक प्रतिनिधित्व अधिनियम, १९५१ नुसार कलम १२६ (१)(ब)च्या अंतर्गंत १९ एप्रिल २०२४ पासून ते १ जून रात्री ६.३० पर्यंत कोणताही मिडिया हाऊस एक्झिट पोल जाहीर करु शकत नाही , निवडणुक आयोगाकडून बंदी घालण्यात आली आहे.

निष्कर्ष : विश्वास न्यूज च्या पडताळणीत सुद्धा ही पोस्ट खोटी आणि एडिटेड असल्याची माहिती दिली. त्यामुळे विश्वास न्यूजच्या पडताळणीत पोस्ट खोटी असल्याचे सत्य समोर आले आहे.

(This story was originally published by Vishvas News, and republished by Maharashtra Times as part of the shakti collective)

Source link

fact checkindia agadhiindia alliancelok sabha electionlok sabha election resultviral post
Comments (0)
Add Comment