Fact Check: निवडणूक आयोगाने मानसिक आरोग्य समुपदेशन केंद्रांबाबत प्रस्ताव दिला? जाणून घ्या सत्य

नवी दिल्ली : लोकसभा २०२४ च्या निवडणुका शेवटच्या टप्प्यात आहेत. सातव्या टप्प्यासाठी १ जून रोजी मतदान होणार आहे. ४ जून रोजी मतमोजणी होणार असून अंतिम निकाल जाहीर होणार आहेत. मात्र, निवडणुकीच्या या रणधुमाळीत सोशल मीडिया एक्सवर एक पोस्ट व्हायरल झाली आहे. या पोस्टनुसार, भारताच्या निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यातील मतदानाची टक्केवारी लक्षात घेऊन लोकांसाठी भारतभर मानसिक आरोग्य समुपदेशन केंद्रे सुरू करण्याचा प्रस्ताव दिला आहे. याची पडताळणी केली असता हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचं समोर आलं आहे.

काय आहे फॅक्ट चेक?

निवडणूक आयोग हा भारतातील संघ आणि राज्य निवडणूक प्रक्रिया आयोजित करण्यासाठी जबाबदार एक स्वायत्त घटनात्मक प्राधिकरण आहे. ही संस्था भारतात लोकसभा, राज्यसभा, राज्य विधानसभा आणि देशातील राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती पदांसाठी निवडणुका घेते. निवडणूक आयोगाची स्थापना २५ जानेवारी १९५० रोजी संविधानानुसार करण्यात आली होती. आयोगाचं सचिवालय नवी दिल्लीत आहे. भारतीय राज्यघटनेचा भाग XV (अनुच्छेद ३२४-३२९) निवडणूक आयोगाविषयी माहिती देतो.
Fact Check: कन्हैया कुमारचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल, ८ वर्ष जुन्या फोटोमागचं सत्य काय?

आतापर्यंत किती टप्प्यात झाल्या लोकसभा निवडणुका?

सात टप्प्यात निवडणुका होत असून त्यापैकी आतापर्यंत सहा टप्प्यांमध्ये मतदान झालं आहे. निवडणुकीचा सातवा टप्पा १ जून रोजी आहे. सर्व जागांसाठी ४ जून रोजी मतमोजणी होणार आहे.

पहिला टप्पा – १९ एप्रिल २०२४ – या टप्प्यात महाराष्ट्र, आसाम, मध्य प्रदेश, बिहार, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मेघालय, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा, राजस्थान, सिक्कीम, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, उत्तराखंड, अंदमान – निकोबार, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, लक्षद्वीप, पाँडिचेरी यांचा समावेश आहे. एकूण १०२ जागांसाठी मतदान झालं.

दुसरा टप्पा – २६ एप्रिल – आसाम, बिहार, छत्तीसगड, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मणिपूर, राजस्थान, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर एकूण ८९ जागांवर मतदान झालं.

तिसरा टप्पा – ७ मे – आसाम, बिहार, छत्तीसगड, गोवा, गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, दादरा नगर हवेली आणि दीव-दमण एकूण ९४ जागांवर मतदान झालं.

चौथा टप्पा – १३ मे – आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा, तेलंगणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीरमधील एकूण ९६ जागांसाठी मतदान झालं.

पाचवा टप्पा – २० मे – छत्तीसगड, झारखंड, महाराष्ट्र, ओडिशा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर आणि लडाख ४९ जागांवर मतदान झालं.

सहावा टप्पा – २५ मे – बिहार, हरियाणा, झारखंड, ओडिशा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि दिल्ली अशा एकूण ५७ जागांवर मतदान झालं.

सातवा टप्पा – १ जून – बिहार, हिमाचल प्रदेश, झारखंड, ओडिशा, पंजाब, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, चंदीगड एकूण ५७ जागांवर मतदान होणार आहे.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात रात्री ११.३० वाजेपर्यंत ६०.०९ टक्के मतदान झालं. पहिल्या चार टप्प्यात ६६.९५ टक्के मतदान झालं. चौथ्या टप्प्यात रात्री ११.४५ वाजेपर्यंत ६७.२५ टक्के, तिसऱ्या टप्प्यात ६५.६८ टक्के, दुसऱ्या टप्प्यात ६६.७१ टक्के आणि पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के मतदान झालं. ही सर्व माहिती निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर सविस्तरपणे उपलब्ध आहे.

निवडणूक आयोगाने मानसिक आरोग्याबाबत प्रस्ताव दिला?

निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर यासंबंधी कोणतीही माहिती नाही किंवा त्यांच्या अधिकृत प्रोफाइलवरून यासंदर्भात कोणतीही मार्गदर्शक तत्त्वं जारी करण्यात आलेली नाहीत. हा दावा पोस्ट करणाऱ्या प्रोफाईलची तपासणी केल्यावर असं दिसून आलं आहे की या प्रोफाईलवरून बहुतांश पोस्ट शेअर केले जातात. प्रत्यक्षात या दाव्यांमध्ये तथ्य नाही. याचं एक कारण म्हणजे सोशल मीडियावर अधिक लाईक्स मिळणं आहे.

हा दावा पोस्ट करणाऱ्या प्रोफाइलचं नाव The Needle आहे. मानसिक आरोग्य समुपदेशन केंद्राशी संबंधित दावा निवडणूक आयोगाने २० एप्रिल २०२४ रोजी सकाळी ११.१७ वाजता या प्रोफाइलवरून केला आहे, जो २३ मे २०२४ पर्यंत ९६४ लोकांनी पाहिला आहे.

हे प्रोफाइल भ्रामक दावे पसरवत असल्याचं दिसतं आहे. ३ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ९.४७ वाजता एक पोस्ट शेअर करण्यात आली होती. या पोस्टमध्ये चीनने अरुणाचल प्रदेशातील ठिकाणांची नावं बदलल्यानंतर, भारतीयांनी याला उत्तर देताना हक्का नूडल्सचं नाव चक्का नूडल्स केलं असल्याचं सांगण्यात आलं. मात्र अशी कोणतीही बातमी प्रसिद्ध झालेली नाही. त्यांची वेबसाइट https://www.theneedle.in/ देखील अद्याप लाइव्ह नाही.

निष्कर्ष

THIP Media च्या पडताळणीत आढळलेल्या तथ्यांच्या आधारे असं दिसून आलं की, भारतातील मतदारांसाठी मानसिक आरोग्य समुपदेशन केंद्रं सुरू करण्याचा भारतीय निवडणूक आयोगाचा दावा पूर्णपणे चुकीचा आहे.

(This story was originally published by THIP Media, and republished by NBT as part of the Shakti Collective.)

Source link

eci mental health counseling centerselection commission mental health counseling centersfack check newslok sabha election 2024निवडणूक आयोग मानसिक आरोग्य समुपदेशन केंद्रंफॅक्ट चेक
Comments (0)
Add Comment