AAP on Exit Poll: मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर मुंडन करेन, आपच्या नेत्याचा निर्धार, एक्झिट पोल खोटे ठरणार…

नवी दिल्ली : ‘नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करणार.’ असे मोठे वक्तव्य आम आदमी पार्टीचे नेते सोमनाथ भारती यांनी केले आहे. लोकसभा निवडणुकीसाठी शनिवारी शेवटच्या टप्प्यात मतदान पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे अंदाज समोर आले आहेत. एक्झिट पोलनुसार देशभरात भाजपा बहुमताचा आकडा गाठणार असल्याचे सांगितले जातेय.

एक्झिट पोलचे हे अंदाज फेटाळून लावत दिल्लीतील आपचे उमेदवार सोमनाथ भारती यांनी एक्झिट पोलचे आकडे खोटे ठरणार असल्याचे आत्मविश्वासाने सांगितले आहे. याबद्दल त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट देखील लिहली आहे. पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ‘जर मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले तर मी मुंडन करणार आहे. हे शब्द लक्षात ठेवा, सर्व एक्झिट पोल खोटे ठरणार असून मोदीजी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणं शक्य नाही.’

एक्झिट पोलला खोटं ठरवण्यासोबतच भारती यांनी इंडिया आघाडीच्या दिल्लीतील विजयाची हुंकार देखील दिली आहे. ते म्हणाले, दिल्लीमध्ये भाजपाचा सुपडासाफ होणार असून सर्व जागांवर इंडिया आघाडीचा विजय होणार आहे.
C Voter Lok Sabha Election Exit Poll 2024: महाराष्ट्रात कांटे की टक्कर, दक्षिणेत भाजपला आशादायी चित्र! एबीपी-सी voter एक्झिट पोलचे निकाल पहा
इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि आप या पक्षांनी दिल्लीतील ७ जागांपैकी प्रत्येकी ४ आणि ३ जागांवर आपले उमेदवार मैदानात उतरवले होते. याच दिल्लीतून समोर येणाऱ्या एक्झिट पोलनुसार भाजपा दिल्लीत ५ ते ७ जागांवर विजय मिळवत आपला दबदबा कायम ठेवणार असल्याचे समजते. हे अंदाज चुकीचे ठरवत भारती यांनी दिल्लीत इंडिया आघाडीच येणार असल्याचे सांगितले आहे.

एक्झिट पोलवर विश्वास न ठेवता आपण ४ जूनच्या जाहीर होणाऱ्या योग्य निकालाची वाट पाहिली पाहिजे. कारण लोकांनी भाजपाच्या विरोधात मतदान केले आहे, अशी टिप्पणी देखील भारतींनी केली आहे.

Source link

aapaap leaderbjpexit poll 2024india alianceloksabha election 2024Narendra Modinew delhiPM Modisomanath bharatiलोकसभा निवडणूक एक्झिट पोललोकसभा निवडणूकीचे निकाल
Comments (0)
Add Comment