नवी दिल्ली: नरेंद्र मोदींनी रविवारी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मोदींसह एकूण ७२ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळात ३० कॅबिनेट मंत्री, ३६ राज्यमंत्री असून ५ जणांकडे स्वतंत्र प्रभार आहे. भाजपला लोकसभेत बहुमत न मिळाल्यानं यंदा मित्रपक्षांना मंत्रिमंडळात चांगला वाटा देण्यात आलेला आहे. पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर १६ तासांनी मोदींनी त्यांच्या तिसऱ्या टर्ममधला पहिला निर्णय घेतला. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी पहिल्या फाईलवर सही केलेली आहे.
नरेंद्र मोदींनी आज पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेशी संबंधित फाईलवर स्वाक्षरी केली. पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या १७ व्या हफ्त्याशी संबंधित फाईलवर मोदींनी स्वाक्षरी केली. या माध्यमातून देशभरातील ९.३ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये एकूण २० हजार कोटी रुपये जमा होतील.
आमचं सरकार शेतकरी कल्याणासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे पहिली स्वाक्षरी शेतकरी कल्याणासाठी आहे. येत्या काळात आम्ही शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी अधिकाधिक काम करु, अशी ग्वाही मोदींनी दिली. त्यामुळे आगामी काळात कृषी क्षेत्रासाठी नव्या सरकारकडून महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला ग्रामीण भागात फटका बसला आहे. त्यामुळे भाजपच्या जागा घटल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदींच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकार शेतकरी आणि ग्रामीण भारतासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे.
नरेंद्र मोदींनी आज पंतप्रधान पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेशी संबंधित फाईलवर स्वाक्षरी केली. पीएम शेतकरी सन्मान निधी योजनेच्या १७ व्या हफ्त्याशी संबंधित फाईलवर मोदींनी स्वाक्षरी केली. या माध्यमातून देशभरातील ९.३ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये एकूण २० हजार कोटी रुपये जमा होतील.
आमचं सरकार शेतकरी कल्याणासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे पहिली स्वाक्षरी शेतकरी कल्याणासाठी आहे. येत्या काळात आम्ही शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी अधिकाधिक काम करु, अशी ग्वाही मोदींनी दिली. त्यामुळे आगामी काळात कृषी क्षेत्रासाठी नव्या सरकारकडून महत्त्वाचे निर्णय अपेक्षित आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला ग्रामीण भागात फटका बसला आहे. त्यामुळे भाजपच्या जागा घटल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मोदींच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकार शेतकरी आणि ग्रामीण भारतासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याची शक्यता आहे.
मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून कोण कोण?
राज्यातील सहा खासदारांना मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं आहे. यात नितीन गडकरी, पियूष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ यांच्यासह प्रतापराव जाधव, रामदास आठवलेंचा समावेश आहे. विदर्भाला दोन, मुंबईला दोन, पश्चिम महाराष्ट्राला एक आणि उत्तर महाराष्ट्राला एक मंत्रिपद मिळालं आहे. शिंदेसेनेला एक राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. रिपाईंलादेखील राज्यमंत्रिपद मिळालं आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसला एकही मंत्रिपद नाही. राष्ट्रवादी कॅबिनेटसाठी आग्रही होती. भाजपकडून त्यांना राज्यमंत्रिपद ऑफर करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीनं ही ऑफर नाकारली.