मनमोहन, अडवाणी, अँटनी; सगळ्यांचे रेकॉर्ड मोडणार मोदींचे मंत्री; नेहरुंचा विक्रम राहणार अबाधित

नवी दिल्ली: नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होण्याचा मान पटकावला आहे. मोदींनी तिसरी टर्म पूर्ण केल्यास त्यांच्या नावाची नोंद इतिहासात होईल. मोदींसोबतच त्यांच्या तीन मंत्र्यांना इतिहास रचण्याची संधी आहे. सलग १० वर्षे एकाच मंत्रालयाची जबाबदारी सांभाळणारे नेते म्हणून त्यांचं नाव इतिहासात लिहिलं जाईल. पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या नावे असलेला विक्रम मात्र अबाधित राहील. नेहरु यांच्याकडे १९५२ ते १९६४ अशी सलग १२ वर्षे परराष्ट्र मंत्रालय होतं. हा विक्रम आजतागायत कायम आहे.

गृहमंत्री अमित शहा

१९५१-५२ मध्ये देशात पहिल्यांदा सार्वत्रिक निवडणूक झाली. नेहरुंच्या मंत्रिमंडळात कैलाश नाथ काटजूंकडे गृहमंत्रिपदाची धुरा होती. ते केवळ चार वर्षेच या पदावर राहिले. १९५५ मध्ये गोविंद बल्लभ पंत गृहमंत्री झाले. ते १९६१ पर्यंत पदावर होते. ७ मार्च १९६१ रोजी त्यांचं निधन झालं.
लोकसभेत सुसाट कामगिरी करणाऱ्या ‘इंडिया’ला धक्का? १० पैकी ९ जागांवर NDAचा विजय पक्का
सर्वाधिक काळ गृहमंत्री राहण्याचा मान बराच काळ पंत यांच्या नावे होता. नंतर हा विक्रम लालकृष्ण अडवाणींच्या नावावर जमा झाला. ते १९९८ ते २००४ अशी सलग ६ वर्षे गृहमंत्री होते. त्यावेळी देशात वाजपेयी सरकार होतं. आता हे दोन्ही विक्रम अमित शहा मोडीत काढू शकतात. ते सलग दुसऱ्यांदा गृहमंत्री झाले आहेत. त्यांनी कार्यकाळ पूर्ण केल्यास त्यांच्या नावे विक्रम जमा होईल.

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह
२०१४ मध्ये मोदी पहिल्यांदा सत्तेत आले, तेव्हा राजनाथ सिंह यांच्याकडे गृह खात्याची जबाबदारी देण्यात आली. २०१९ मध्ये त्यांना संरक्षण मंत्री करण्यात आलं. आताही त्यांच्याकडे तोच पदभार आहे. सलग दुसऱ्यांदा संरक्षण मंत्री होणार ते देशातील केवळ दुसरे नेते आहेत. याआधी काँग्रेसचे ए. के. अँटनी २००६ ते २०१४ अशी सलग ८ वर्षे संरक्षण मंत्री होते. राजनाथ सिंह यांना अँटनींचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
शहांच्या चेहऱ्यावर प्रचंड राग, अँग्री लूकची चर्चा; नेमकं काय घडलं? भाजप नेत्यानं सांगितलं
अर्थमंत्री निर्मला सीतारामन

मोदी सरकारमध्ये २०१७ मध्ये सीतारामन यांना संरक्षण मंत्रिपद देण्यात आलं. २०१९ मध्ये त्यांच्याकडे अर्थमंत्री पदाची जबाबदारी आली. मोदींच्या तिसऱ्या टर्ममध्ये त्यांचं मंत्रिपद कायम आहे. सलग दोनदा अर्थमंत्रिपद भूषवणाऱ्या त्या पहिल्या नेत्या आहेत. देशाचे पहिले अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी १९५६ मध्ये पदाचा राजीनामा दिला. ते १९५० पासून पदावर होते. पण निवडून आलेल्या सरकारमध्ये त्यांचा कार्यकाळ चार वर्षांचाच होता.

चार दशकांनंतर मनमोहन सिंग यांच्या रुपात देशानं कार्यकाळ पूर्ण करणारा अर्थमंत्री पाहिला. ते १९९१ ते १९९६ अशी सलग पाच वर्षे अर्थमंत्री होते. यानंतर अरुण जेटलींनी २०१४ ते २०१९ अशी पाच वर्षे अर्थमंत्रिपद सांभाळलं. त्यांनी कार्यकाळ पूर्ण केला. २०१९ पासून सीतारामन यांच्याकडे अर्थमंत्रिपद आहे. त्यांनी दुसरी टर्म पूर्ण केल्यास त्यांच्या नावे विक्रमाची नोंद होईल.



Source link

amit shahModi governmentNirmala SitharamanRajnath Singhअमित शहानरेंद्र मोदीनिर्मला सीतारामनमोदी सरकारराजनाथ सिंह
Comments (0)
Add Comment