Jammu-Kashmir : जम्मू-काश्मीरमध्ये तणाव कायम, बारामूल्लामध्ये सैन्यदलाकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

बारामुल्ला ( जम्मू-काश्मीर) : जम्मू काश्मीर मधील एकापाठोपाठ एक झालेल्या दहशतवादी घटनांचं सत्र सुरुच आहे. बुधवारी बारामुल्ला येथील शोधमोहीमेदरम्यान झालेल्या चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दलाला यश आले. उच्चस्तरीय बैठकांनंतर जम्मू-काश्मीर मध्ये सुरक्षा यंत्रणा आता हायअलर्टवर आहेत.

उत्तर काश्मीर येथील सोपोर मध्ये दोन दहशतवादी असल्याची बातमी रविवारी सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर सैन्यदलांकडून लगेचच जिल्ह्यातील आरागाम भागामध्ये नाकाबंदी करुन शोधमोहीम राबविण्यात आली. दरम्यान बुधवारी दहशतवाद्यांच्या ठिकाणाजवळ पोहोचताच सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार सुरु झाला. यामध्ये भारतील सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. परंतू या दहशतवाद्यांची अध्याप ओळख पटली नसल्याचे सांगण्यात येत आहे.सुरक्षा दलांची मोहीम अध्याप सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
PM Narendra Modi :भारतातील १६०० वर्षे जुन्या ज्ञानकेंद्राचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन,१७४९ कोटींच्या या विद्यापीठाचा हा आहे गौरवशाली वारसा

ड्रोनद्नारे दहशतवाद्याच्या प्रेताची पाहणी

सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील या वाढत्या चकमकी जम्मू-काश्मीरमधील तणावपूर्ण स्थिती दर्शवणाऱ्या आहेत. सोमवारी उत्तर काश्मीर येथील बंदीपोरा येथे देखील चकमक पहायला मिळाली होती. यामध्ये सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केले होते. गोळीबारानंतर सुरक्षा दलांनी ड्रोनद्नारे दहशतवाद्याच्या प्रेताची पाहणी केली तेंव्हा त्याच्या हातात एक एम ४ रायफल दिसून आली होती.

उच्चस्तरीय बैठकींचा परीणाम

या महिन्यातील एकापाठोपाठ एक घडलेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या होत्या. रियासी,कठुआ आणि डोडा येथील दहशतवादी घटनांनी सगळ्यांचे लक्ष जम्मू-काश्मीरकडे वेधले होते.याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरक्षा दलांची एक उच्चस्तरीय बैठक घेतली होती.या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल देखील उपस्थित होते.परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा यंत्रणा तैनात करणे,तसेच दहशतवाद विरोधी कारवाई करणाऱ्या अभियानांचाही त्यांनी आढावा घेतला होता. या बैठकीमध्ये त्यांनी दहशतवाद विरोधी कारवाईसाठीची तमाम यंत्रणा तैनात करण्याचे आदेश दिले होते. सोबतच जम्मू-काश्मीरचे राज्यपाल मनोज सिन्हा यांचेकडूनही परिस्थितीचा आढावा घेतला होता.

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी देखील काही दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेवून हे वाढते हल्ले रोखण्यासाठी दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देण्यासाठी युद्धपातळीवर काम करण्याच्या सुचना सुरक्षा दलांना दिल्या होत्या. यावेळी त्यांनी अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर तेथील सुरक्षा व्यवस्थांचा आढावाही घेतला होता.

Source link

amit shahaJammu-kashmir attackkathua terror attackNarendra Modireasi terror attackterriorist killed by security forcesअमित शहाकठुआ दहशतवादी हल्लाजम्मू-काश्मीर दहशतवादी हल्लानरेंद्र मोदीरियासी दहशतवादी हल्ला
Comments (0)
Add Comment