संजय गांधींच्या ‘त्या’ निर्णयामुळे काँग्रेसची व्होटबँक दुरावली; वाजपेयींनी केले भरसंसदेत कौतुक

Sanjay Gandhi Death Anniversary : संजय गांधी यांचा जन्म १४ डिंसेबर १९४६ साली झाला, देशाचे माजी पंतप्रधान राजीव गांधी त्यांचे मोठे बंधू आहेत. दिल्लीच्या सेंट कोलंबिया शाळेतून त्यांनी शिक्षण पूर्ण केले त्यांनतर पुढील काही शिक्षण त्यांनी स्वित्झर्लंडला पूर्ण केले. संजय गांधी यांना स्पोर्टस कार, विमान यांची अधिक आवड होती. इंग्लंडच्या रोल्स रॉयल कंपनीत गांधींनी इंटरनशीप केली होती. देशात पहिली स्वदेशी आणि स्वस्त कार बनवण्याचे स्वप्न संजय गांधींनी उराशी बाळगले.१९७१ च्या काळात सरकारने सुद्धा प्रस्तावला मान्यता दिली आणि मारुती मोर्टस लिमिटेडची स्थापना झाली. या कंपनीचे पहिले व्यवस्थापकीय संचालक म्हणून संजय गांधींनी स्वस्त आणि स्वदेशी कार बनवण्याचे स्वप्न पुर्ण केले.

आणीबाणीच्या काळानंतर इंदिरा गांधी आणि काँग्रेसचे सल्लागार म्हणून संजय गांधींनी पडद्यामागून काम केले. कोणतेही पद नसताना सरकारमध्ये गांधींचा पूर्णपणे अंकुश होता.माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे इंद्र कुमार गुजराल यांनी संजय गांधी यांच्या हस्तक्षेपावर आक्षेप नोंदवला आणि राजीनामा दिला त्यावेळी गुजराल यांची बरीच चर्चा रंगली.१९७० पासून संजय गांधी राजकरणात सक्रिय झाले १९८० पर्यंत देशात आणि भारताच्या राजकरणात त्यांचे वेगळे स्थान निर्माण झाले.
Sanjay Gandhi: बॉलिवूडचा तो सिनेमा संजय गांधींसाठी ठरलेला संकट, सुनावलेला २ वर्षांचा तुरुंगवास

आणीबाणी नंतर १९७६ मध्ये नसबंदीचा घेतलेला निर्णय आजही अनेक भारतीयांना आठवणीत असलेला काळ आहे. भारताची लोकसंख्या नियंत्रणात आण्यासाठी गांधींनी नसबंदीची योजना आणली जवळजवळ पाच लाखांहून अधिक लोकांची नसबंदी करण्यात आली पण याच वेळी जनमत कॉग्रेसविरोधात फिरले. संजय गांधी यांच्यावर मार्च १९७७ प्राणघातक हल्ला सुद्धा करण्यात आला होता, त्यांचा गाीवर काही अज्ञातांनी गोळीबार केला होता. १९७७ साली अमेठीतून लोकसभा लढवली पण संजय गांधींना पराभवाचा सामना करावा लागला पण १९८० मध्ये पुन्हा अमेठीतून संजय गांधी यांना विजय मिळला आणि ते लोकसभेवर गेले.

1980 च्या काळात काँग्रेसने जोरदार कमबॅक केले होते. इंदिरा गांधी पुन्हा पंतप्रधान बनल्या होत्या. दरम्यान फेब्रुवारीतील संसदेच्या अधिवेशानात राष्ट्रपतींचे अभिवादन भाषण पार पडले, त्यानंतर काँग्रेसने ठरवले होते संसदेत अटलबिहारी वाजपेयींच्या आधी संजय गांधी बोलतील. पण संसदेतील हेचले संजय गांधींचे भाषण गाजले. आणीबाणीच्या काळातील टीका, काँग्रेसवर विरोधकांचा हल्लाबोल अशा साऱ्याच मुद्द्यावर संजय गांधींनी मौन सोडले. भाजपवर संसदेत कडाडून हल्लाबोल चढवला. अटल बिहारी वाजपेयींवर थेट टीका केली. यानंतर काँग्रेस नेत्यांना भीती होती की अटल बिहारी वाजपेयी यांच्या सारखे मुरब्बी नेते संजय गांधींना कसे प्रत्युत्तर देतील पण वाजपेयींनी संजय गांधींवर टीका केली नाही. इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांच्याकडे पाहून काँग्रेसचे आणि नेतृत्वाचे कौतुक केले.
Rahul Gandhi Birthday : ‘माझा सखा, एक मार्गदर्शक!’ राहुल गांधींच्या वाढदिवसानिमित्त बहिण प्रियंकांनी दिल्या गोड शुभेच्छा

दुर्देवाने संजय गांधींचे संसदेतील ते भाषण शेवटचे ठरले त्यानंतर २२ जून १९८० साली त्यांचा मृत्यू झाला. विमान अपघतात संजय गांधी यांचा मृत्यू झाला. दिल्ली सफदरजंग विमानतळानजीक विमान उडवत असताना अपघाताने संजय गांधींनी जीव गमावला. इंदिरा गांधींना मोठा धक्का बसला यानंतर इंदिरा गांधींसाठी राजीव गांधी राजकरणात आले आणि संजय गांधींची उणीव त्यांनी भरुन काढली, पुढे देशाचे पंतप्रधानपद पण राजीव गांधींनी भुषवले.

Source link

Congressemergency in indiaIndira Gandhisanjay gandhisanjay gandhi death anniversaryइंदिरा गांधीकाँग्रेसभारतात आणीबाणीसंजय गांधीसंजय गांधी मृत्यू दिन
Comments (0)
Add Comment