Ayodhya Ram Mandir : पहिल्याच पावसाने अयोध्येतील राममंदिराला लागली गळती, मंदिराच्या बांधकामात हलगर्जीपणा, मंदिराचे मुख्य पुजारी भडकले

अयोध्या : उत्तरप्रदेशमधील अयोध्या येथे 22 जानेवारी भव्य अशा राममंदिराचे लोकार्पण झाले. 500 वर्षापासून लोक राममंदिर होण्याचे स्वप्न पाहत होते अखेर ते पूर्ण झाले आहे. परंतु आता याच मंदिराविषयी धक्कादायक बातमी समोर आली आहे. अयोध्येत पावसाला सुरवात झाली असून पहिल्याच पावसाने राम मंदिराच्या छताला गळती लागली आहे. राममंदिराचे प्रमुख पुजारी आचार्य सत्येंद्र दास यांनी याबाबतची माहिती दिली आहे.

दुरुस्ती करूनही पुन्हा गळती

काही दिवसांपूर्वी मंदिराच्या छतातून पाणी गळत आहे ही गोष्ट लक्षात आली होती. त्यानंतर काम करून गळती थांबवण्यात आली. त्यानंतर मान्सूनपूर्व पहिल्या पावसाने पुन्हा एकदा मंदिराच्या छताला गळती लागली आहे. त्यामुळे पूजाऱ्यांची बसण्याची जागा आणि व्हीआयपी दर्शनासाठी येणाऱ्या लोकांची जागा ओली होत आहे. पावसाचे पाणी मोठ्याप्रमाणात साचल्यामुळे पाणी बाहेर काढण्यास अडचणी निर्माण होत आहेत.

राममंदिराच्या बांधकामात हलगर्जीपणा

मंदिराचे प्रमुख पुजारी आचार्य सत्येंद्रदास यांनी मंदिराच्या बांधकामाबाबत नाराजी दर्शवली आहे. ते म्हणाले की, ”अयोध्येतील राम मंदिराच्या छतामधून या आधी पाणी गळत होते. त्यानंतर त्याचे दुरुस्तीचे काम करण्यात आले. परंतु आता पुन्हा एकदा पाणी गळू लागले आहे. राममंदिराच्या बांधकामात हलगर्जीपणा झाला आहे. सकाळी पुजारी पूजा करण्यासाठी गेले असता गर्भगृहात मोठ्या प्रमाणात पाणी आढळून आले”.
Parliament Session:केंद्रीय शिक्षणमंत्री शपथ घ्यायला उठले, तोच सभागृहात ‘नीट-नीट’ चे नारे,विरोधी पक्ष आक्रमक

टाटा कन्सल्टन्सी आणि एलएनटी कंपनीने मिळून केले काम

राम मंदिराच्या उभारणीचे काम टाटा कन्सल्टन्सी आणि एलएनटी कंपनीने केले आहे. 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा करून भव्य मंदिर सर्वसामान्य भक्तांसाठी खुले करण्यात आले आहे.या सोहळ्यात हजारो लोक भक्त अयोध्येत दाखल झाले होते.

Source link

ayodhya newsayodhya ram templeTOPIC ram mandirअयोध्याअयोध्या न्यूजराम मंदिर पाणी गळतीराममंदिर
Comments (0)
Add Comment