मोदी सरकारची डोकेदुखी वाढणार; १० वर्षे साथ देणाऱ्या पक्षाचा आक्रमक पवित्रा, आघाडी उघडली

नवी दिल्ली/भुवनेश्वर: ओडिशाचे माजी मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील एनडीए सरकारविरोधात आघाडी उघडली आहे. आम्ही मजबूक आणि जिवंत विरोधी पक्ष आहोत, अशी भूमिका बीजू जनता दलानं घेतली आहे. कोणत्याही विषयावर केंद्र सरकारला पाठिंबा देणार नाही आणि ओडिशाच्या हितासाठी संसदेत आवाज उठवू, असा आक्रमक पवित्रा बीजेडीनं घेतला आहे.

बीजेडीनं गेल्या १० वर्षांमध्ये मोदी सरकारला बरीच मदत केली. अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर त्यांनी सरकारला सहकार्य केलं. राज्यसभेत भाजपकडे बहुमत नसल्यानं बीजेडीनं त्यांना कायम मदतीचा हात दिला. बीजेडीच्या सहकार्यामुळेच राज्यसभेत सरकारला अनेक महत्त्वाची विधेयकं मंजूर करण्यात यश आलं. पण नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ओडिशात भाजपनं बीजेडीचा पराभव केला. त्यामुळे तब्बल २४ वर्षे मुख्यमंत्री राहिलेल्या नवीन पटनायक यांना पायउतार व्हावं लागलं. यानंतर बीजेडीनं भाजपला आव्हान देण्याची भाषा सुरु केली आहे.
महाराष्ट्र सदनातील CM सूट मुक्कामासाठी हवा! कंगनाची अजब मागणी; बड्या नेत्याला फोन, पण…
माजी मुख्यमंत्री पटनायक यांनी सोमवारी भुवनेश्वरमध्ये राज्यसभेच्या नऊ खासदारांची बैठक घेतली. केंद्र सरकारला राज्यसभेत घेरण्याची रणनीती यावेळी आखण्यात आली. राज्याचा विकास आणि ओडिशातील नागरिकांचं कल्याण या दोन गोष्टींवर भर द्या. आपल्या अनेक मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे राज्यातील ४.५ कोटी लोकांचा आवाज व्हा आणि संसदेत बाजू मांडा, अशा सूचना पटनायक यांनी केल्या.

बीजेडीनं घेतलेली आक्रमक भूमिका भाजपसाठी धक्का मानला जात आहे. गेल्या १० वर्षांत बीजेडी आणि आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डींच्या वायएसआर काँग्रेसनं राज्यसभेत भाजपला साथ दिली. २००९ आणि २०१४ मध्ये झालेल्या राज्यसभा निवडणुकीत अश्विनी वैष्णव (विद्यमान रेल्वेमंत्री) यांना निवडून आणण्यात बीजेडीची भूमिका महत्त्वाची ठरली होती. दिल्ली सेवा विधेयक मंजूर करण्यात, मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव हाणून पाडण्यात, ट्रिपल तलाक या सगळ्यांमध्ये बीजेडीनं भाजपला सहकार्य केलं.
लोकसभेत ताकद दाखवली, आता शिंदेसेनेची मोठी मागणी; भाजपच्या गडात मारणार मुसंडी, टार्गेट ठरलं
मे-जूनमध्ये ओडिशात लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका झाल्या. भाजपनं राज्यातील २१ पैकी २० जागा जिंकत बीजेडीला पराभवाचा धक्का दिला. विधानसभा निवडणुकीतही भाजपनं सत्ताधारी बीजेडीला धूळ चारली. मुख्यमंत्री पटनायक यांचा भाजपच्या लक्ष्मण बाग यांनी पराभव केला. बीजेडीला १४७ पैकी केवळ ५१ जागा मिळाल्या. पाच वर्षांपूर्वी बीजेडीनं ११२ जागा जिंकल्या होत्या. यंदा भाजपनं ७८ जागा जिंकत ओडिशात पहिल्यांदाच सरकार स्थापन केलं.

Source link

BJDNarendra Modinaveen patnaiknda governmentrajya sabhaएनडीए सरकारनरेंद्र मोदीनवीन पटनायकबीजेडीभाजप
Comments (0)
Add Comment