रश्मी मिश्रा या जयपूर येथे आर्मी इंटेलिजन्समध्ये मूळ पोस्टिंगला होत्या. सहा महिन्यांच्या ट्रेनिंगसाठी त्या पुण्यात आल्या होत्या. त्यावेळी त्या आर्मी ट्रेनिंग स्कूलमध्ये वास्तव्यास होत्या. रश्मी यांनी तीम महिन्यांचे ट्रेनिंग पूर्ण केले होते. ट्रेनिंग स्कुलमध्येच त्यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती आहे. कौटुंबिक वादातून त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
वाचाः बिबवेवाडी खून प्रकरण: मुख्य आरोपी स्वत:हून पोलिसांसमोर हजर
लेफ्टनंट कर्नल रश्मी मिश्रा यांचे पती लष्करात कर्नल पदावर कार्यरत आहेत. तसंच, त्यांचे वडीलही लष्करी अधिकारी आहेत. मिश्रा व त्यांचे पती यांच्यात मतभेद असून ते वेगळे राहतात. त्यांचा घटस्फोटाचा अर्जही न्यायालयात प्रलंबित आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
वाचाः ‘त्या तक्रारींचे पुढे काय झालं’?; राष्ट्रवादीची सोमय्यांविरोधात बॅनरबाजी