PM Modi Parliamentary Speech : लोकसभेत काल ‘बालबुद्धीचा खेळ’ झाला, पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर जहरी टीका

नवी दिल्ली : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी (1 जुलै) हिंदुत्व, अग्निवीर योजना, नीट परीक्षा प्रकरणावरून भाजपवर जोरदार टीका केली. यालाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ( 2 जुलै) प्रत्युत्तर दिले आहे.”लोकसभेत काल बालबुद्धीचा खेळ पाहायला मिळाला”.असं म्हणत पंतप्रधान मोदी यांनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

पंतप्रधानांच्या भाषणातील काही महत्त्वाचे मुद्दे –

1) जनतेने आमचा १० वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीवरून कॉंग्रेसवर टीका केली आहे. ते म्हणाले की, ”2024 ची निवडणूक ही जगातील सर्वात मोठी निवडणूक होती. देशाच्या जनतेने आम्हाला तिसऱ्यांदा सेवा करण्याची संधी दिली आहे. देशातील जनतेने प्रत्येक कसोटीवर आमची परीक्षा घेतल्यानंतर आम्हाला हा जनादेश दिला आहे. जनतेने आमचा १० वर्षांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहिला आहे. आम्ही गरिबांच्या कल्याणासाठी समर्पितपणे काम केल्याचे जनतेने पाहिले आहे. 25 कोटी लोक गरिबीतून बाहेर आले आहेत”.

2) 10 वर्षात देशाला घोटाळ्याच्या गर्तेतून बाहेर काढले

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, ”या देशाने तुष्टीकरणाच्या कारभाराचे मॉडेलही दीर्घकाळ पाहिले आहे. आणि धर्मनिरपेक्षतेसाठी केलेले प्रयत्नही पाहिले. 2014 पूर्वी दररोज घोटाळ्यांच्या बातम्या येत होत्या. तो काळ घोटाळ्यांचा होता. लोक म्हणायचे की काहीही होऊ शकत नाही. गरीब लोक रेशनसाठी लाच देत असत. लाच दिल्याशिवाय गॅस कनेक्शन मिळत नव्हते. आम्ही 10 वर्षात देशाला या गर्तेतून बाहेर काढले आहे. आता देशाचा आत्मविश्वास शिगेला पोहोचला आहे”.

3) 2014 पूर्वी दहशतवादी हवे तिथे हल्ले करायचे

कॉंग्रेस सरकारच्या कार्यकाळातील कामकाजावर मोदींनी टीका केली आहे ते म्हणाले की, ”2014 पूर्वी दहशतवादी हवे तिथे हल्ले करू शकत होते. 2014 नंतर भारत बदलला, भारत आता घरात घुसून मारतो. दहशत माजवणाऱ्यांना धडा शिकवतो. कलम ३७० ने जम्मू-काश्मीरमधील लोकांचे हक्क हिरावून घेतले होते. 370 च्या काळात दगडफेक केली जात होती”.
Narendra Modi Speech: लोकसभेत पंतप्रधानांचे विरोधकांना प्रत्युत्तर, कॉंग्रेसच्या अपयशाचा पाढा वाचला, नेमकं काय म्हणाले?

4) देशाची अर्थव्यवस्था 10 व्या स्थानावरून 5 स्थानावर आणली

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की ,”गेल्या 10 वर्षात भारताची अर्थव्यवस्था 10व्या स्थानावरून पाचव्या स्थानावर गेली आहे. आता आपण देशाच्या अर्थव्यवस्थेला तिसऱ्या क्रमांकावर नेऊ.10 वर्षात आम्ही भारताला मोबाईल फोनचा एक मोठा उत्पादक आणि निर्यातदार बनवले.आता या कार्यकाळात आम्ही सेमीकंडक्टर आणि इतर क्षेत्रातही काम करणार आहोत”.

5) गरिबांसाठी चार कोटी घरे बांधली

पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात गरिबांसाठी घरे तसेच लखपती दीदी योजनेचा उल्लेख केला आहे. ते म्हणाले की, ”आम्ही गरिबांसाठी चार कोटी घरे बांधली आहेत. आगामी काळात आणखी तीन कोटी घरे बांधली जातील. गेल्या 10 वर्षात आपण महिला बचत गटांच्या क्षेत्रात खूप प्रगती केली आहे. आता आम्हाला त्यांच्या आर्थिक क्रियाकलापांचा विस्तार करायचा आहे. 3 कोटी बहिणींना लखपती दीदी बनवण्याचा आमचा संकल्प आहे”.

6) काँग्रेसला फक्त विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश

मोदी पुढे म्हणाले की, ”जनतेने काँग्रेसला फक्त विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश दिला आहे. आणि वाद संपल्यावर ओरडत रहा आणि ओरडत रहा. काँग्रेसच्या इतिहासात ही पहिलीच वेळ आहे जेव्हा पक्ष सलग तीन वेळा 100 चा आकडा पार करू शकला नाही. काँग्रेसने आपला पराभव मान्य केला असता, सार्वजनिक व्यवस्था स्वीकारून आत्मपरीक्षण केले असते तर बरे झाले असते. पण ते शिरशासन करण्यात व्यस्त आहेत”.

Source link

modi TOPICnarendra modi newsnarendra modi vs rahul gandhipm modi newsPM Modi Parliamentary Speechनरेंद्र मोदी न्यूजनरेंद्र मोदी भाषणराहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदीसंसद पावसाळी अधिवेशनसंसदीय अधिवेशन
Comments (0)
Add Comment