काँग्रेसकडून निवडून आलेलो, त्याचा अभिमान; संसदेत बोलले अशोक चव्हाण, नेमकं काय घडलं?

नवी दिल्ली: राज्यसभेचे खासदार झाल्यानंतर सदनात पहिल्यांदाच भाषण करणाऱ्या अशोक चव्हाणांनी संविधान बदलाचं नरेटिव्ह, नीट परीक्षा, केशवानंद भारती खटला यावर सविस्तर भाष्य केलं. पण त्यांच्या भाषणाची सुरुवात काँग्रेसच्या उल्लेखानं झाली. त्यामुळे राज्यसभेत लक्षवेधी किस्सा घडला.

संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु आहे. राज्यसभेत सभापती जगदीप धनखर यांनी खासदार अशोक चव्हाण यांचं नाव पुकारलं. चव्हाण भाषणासाठी उभे राहिले. आदरणीय सभापतीजी म्हणत त्यांनी भाषणाला सुरुवात केली. पण तितक्यात सभापतींनी त्यांना रोखलं. चव्हाण यांचं पहिलंच भाषण असल्यानं सभापतींनी त्यांची तोंडओळख सभागृहाला करुन दिली.
राष्ट्रवादीकडून विधान परिषदेच्या उमेदवारांची घोषणा; अजितदादांनी शब्द पाळला, दोन नावं जाहीर
अशोकराव शंकरराव चव्हाण, महाराष्ट्राचे दोनवेळा मुख्यमंत्री, लोकसभेचे दोनदा सदस्य, चारवेळा आमदार आणि परिषदेचे सदस्य अशी माहिती देत सभापतींनी सभागृहाला चव्हाणांचा अल्पपरिचय दिला. चव्हाणांनी भूषवलेल्या पदांची माहिती सभापतींकडून दिली जात असताना सभागृहातील काही खासदारांनी काँग्रेस, काँग्रेस असं ओरडण्यास सुरुवात केली. जुन्या पक्षाच्या उल्लेखानं खासदारांनी चव्हाणांचं लक्ष वेधून घेतलं.
Pankaja Munde: लोकसभेतील पराभवानंतर लगेच परिषदेवर संधी; पंकजा मुंडेंच्या आमदारकीनं भाजपनं साधल्या ३ गोष्टी
खासदार काँग्रेस, काँग्रेस करु लागताच अशोक चव्हाणांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं. होय, होय, मी काँग्रेसकडूनच होतो. सभापती महोदय, तुम्ही माझा बायोडेटा संक्षिप्त रुपात वाचलात, भूषवलेल्या पदांचा उल्लेख केल्यात त्याबद्दल आपले आभार. मी काँग्रेसकडून निवडून आलो होतो आणि मला त्याा अभिमान आहे. त्याबद्दल कोणतीही शंका असण्याचं कारण नाही, असं चव्हाण म्हणाले. यावर सभापतींनी मंद स्मित केलं.
Pankaja Munde: भाजपकडून पुनर्वसन, पंकजा मुंडे परिषदेवर; अर्ज भरण्याआधी म्हणाल्या, आमचे नेते देवेंद्र फडणवीस
पहिल्या भाषणात काय म्हणाले चव्हाण?
लोकसभा, राज्यसभेत खासदार बोलतात. त्यांना संरक्षण असतं. संरक्षण असल्यानं फायदा मिळतो. पण खासदारांच्या बोलण्यात सत्यता असायला हवी. सध्याच्या घडीला नरेटिव्ह पसरवली जातात. सध्याचा जमाना नरेटिव्हचा आहे. त्याचा अनुभव आपण सगळ्यांनीच घेतलेला आहे. खरे, खोटे नरेटिव्ह पसरवले जातात, असं चव्हाण म्हणाले.

लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु असताना संविधान बदलणार असल्याचं नरेटिव्ह पसरवण्याच आलं आहे. भाजपला घटना बदलायची आहे असं नरेटिव्ह मांडण्यात आलं. त्यात तथ्य नसल्याचं खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सांगितलं. संविधान बदलाचं नरेटिव्ह खोटं होतं. पण राजकीय नेत्यांच्या भाषणांमध्ये त्याच गोष्टीचा उल्लेख होता, याची आठवण चव्हाणांनी करुन दिली.

Source link

ashok chavan rajya sabhabjpCongresslok sabha election 2024अशोक चव्हाणजगदीप धनखड़भाजप खासदारराज्यसभा भाषण
Comments (0)
Add Comment