Bihar Politics: भाजपकडून राज्यांसाठी प्रभारींची नावं जाहीर, बिहारमध्ये विनोद तावडे कायम, तर जावडेकरांकडे केरळची जबाबदारी

वृत्तसंस्था, नवी दिल्ली : भाजपच्या केंद्रीय पक्ष नेतृत्वाकडून शुक्रवारी विविध राज्यांचे प्रभारी आणि सहप्रभारी यांची नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यात बिहारच्या प्रभारीपदी विनोद तावडे यांची नियुक्ती कायम राहिली आहे. तसेच प्रकाश जावडेकर यांच्याकडे केरळची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. यात बिहारमध्ये पुढील वर्षी तर केरळमध्ये २०२६ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे.

सतीश पुनिया यांच्याकडे हरयाणाची जबाबदारी

विनोद तावडे यांच्यासह तरुण चुघ यांच्याकडे जम्मू व काश्मीर तर राधामोहनदास अग्रवाल यांच्याकडे कर्नाटक या राज्याचे प्रभारीपद कायम राहिले आहे. भाजप नेतृत्वाने सतीश पुनिया यांच्याकडे हरयाणाची जबाबदारी सोपविली आहे. महाराष्ट्रासोबत हरयाणात या वर्षाअखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत.

ओडिशाचे प्रभारी कोण?

बिहारमधील भाजप आमदार नितीन नबिन हे छत्तीसगड, आशिष सूड हे गोवा, श्रीकांत शर्मा हे हिमाचल प्रदेश, लक्ष्मीकांत बाजपाई हे झारखंड, महेंद्र सिंह हे मध्य प्रदेश आणि विजयपाल सिंह हे ओडिशा या राज्यांचे प्रभारी असतील.

मोदी सरकार कोसळणार! लालूप्रसाद यादव यांची भविष्यवाणी, निवडणुकांसाठी तयार राहण्याची दिली सूचना
ईशान्येकडील राज्यांचे समन्वयक

गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस दुष्यंत कुमार गौतम यांच्याकडे अनुक्रमे पंजाब आणि उत्तराखंड या राज्याची जबाबदारी कायम राहिली आहे. तसेच भाजपचे ओडिशातील खासदार संबित पात्रा यांच्याकडे ईशान्येकडील राज्यांचे समन्वयक म्हणून जबाबदारी कायम राहिली आहे.पक्षाने बहुतांश राज्यांसाठी सहप्रभारी नियुक्त केले होते. राज्य प्रभारी हे राष्ट्रीय नेतृत्व आणि राज्य नेतृत्व यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. महाराष्ट्रासोबत हरयाणात या वर्षाअखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत.

‘मोदी सरकार ऑगस्टमध्ये कोसळेल’ – लालू प्रसाद
पाटणा :‘केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार कमकुवत असून, ते ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीस पडू शकते,’ असा अंदाज ‘राष्ट्रीय जनता दला’चे (आरजेडी) अध्यक्ष लालू प्रसाद यांनी शुक्रवारी व्यक्त केला. पक्षाच्या स्थापनेला २८ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

‘यंदाच्या निवडणुकीत ‘आरजेडी’ने मतांची टक्केवारी सुधारली आहे. यातून ताकद मिळवून सरकार पडल्यास त्यासाठी तयार राहा,’ असे आवाहन लालू प्रसाद यादव यांनी या वेळी कार्यकर्त्यांना केले. ‘आरजेडी हा बिहार विधानसभेतील काही काळापासून सर्वांत मोठा पक्ष आहे. त्याबरोबरच इतरांसारखी विचारसरणीशी कधीही तडजोड केली नाही,’ असा टोमणाही त्यांनी लगावला.

Source link

bihar politicsprakash javadekarsatish puniavijay rupanivinod tawdeभाजपराधामोहनदास अग्रवालविधानसभा निवडणूका २०२४
Comments (0)
Add Comment