
Tej Police Times
खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात सोडलेल्या पाण्यावरून पुण्यात गुरुवारी उद्भवलेल्या पूरस्थितीबाबत जलसंपदा विभाग आणि महापालिका यांच्यात आरोपांची ‘चिखलफेक’ झाली. या पुराची पूर्वकल्पना महापालिकेला दिल्याचा दावा जलसंपदा विभागाने केला, तर सांगितल्यापेक्षा अधिक विसर्ग केल्यामुळे पूर आल्याचा पवित्रा महापालिका प्रशासनाने घेतला. दरम्यान, केंद्रीय नागरी विमान वाहतूकमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी शुक्रवारी झालेल्या बैठकीत जलंसपदा विभागाला धारेवर धरले.
मोहोळ यांनी शुक्रवारी घेतलेल्या आढावा बैठकीत हा सारा प्रकार घडला. पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाल्याने धरणातून पाणी सोडणे आवश्यक होते. जलसंपदा विभागाने पाणी सोडण्याची सूचना २२ जुलैपासून पुणे महापालिका नियंत्रण कक्ष आणि जिल्हा आपत्ती निवारण कक्ष यांना दिली होती, असे स्पष्टीकरण जलसंपदा विभागाने दिले. धरणातील पाण्याचा विसर्ग बुधवारी मध्यरात्री अचानक ४० हजार क्युसेकपर्यंत वाढवल्याने अनेक घरांत पाणी घुसले होते.
Recover your password.
A password will be e-mailed to you.