
Tej Police Times
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे यांनी ट्वीट केले पुढीलप्रमाणे, “२७ जुलै २००५ हा दिवस शिवसैनिकांसाठी काळा दिवस! नुसत्या ‘नावा’चा आणि ‘प्रॉपर्टी’चा वारसा सांगणारे मौजमजेसाठी अंथरुणात खिळलेल्या बापाला पुरात ‘एकटं’ सोडून पळून गेले, तो हाच दिवस! हो, आमचे हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या दिवशी मातोश्रीवर एकटे पडले होते. ज्यांनी महाराष्ट्र, हिंदुत्व, मराठी माणूस सांभाळला… पण त्यांच्याच पुत्राने ‘नीतिमत्ता’ सोडून, मातोश्रीवर बाळासाहेबांना ‘एकटं’ टाकून, कुटुंबीयांसोबत फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये पलायन केले.आणि तेच आता आपल्या चेल्यांसह, ‘माझा बाप चोरल्या’ची आवई उठवतात…लाज वाटते का लाज … जनाची ना मनाची तरी…? #काळादिवस”
Uddhav Thackeray : बावनकुळेंच्या वक्तव्याने फसवणुकीची जाणीव, भाजप नेत्याचा संताप, मातोश्रीवर शिवबंधन बांधलं
तर पुढे ज्योती वाघमारे शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या यांनी काय ट्वीट केले पाहा, “जन्मदात्याला भोवला त्याला लेक म्हणू नये हिंदूहदयसम्राटाना पूरस्थितीत एकटे टाकून नटसम्राट फाईवस्टार हॉटेल मध्ये वाढदिवस साजरा करत होते त्याला आज 19 वर्षे पूर्ण होतील. आईवडिलांना सांभाळणारा श्रावणबाळ पण वडिलांच्या जीवाशी खेळणारा हा तर महाराष्ट्राचा #रावणबाळ” असा ट्वीटरवर उल्लेख केला आहे.
तर संजय शिरसाट यांनी बोलताना उद्धव ठाकरेंना राजकरणात यायचं नव्हते पण त्यांनी नको ते निर्णय घेतले आणि पक्षाची वाट लागली असे शिरसाट म्हणाले. तर उद्धव ठाकरेंनी कधीच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होवू नये अन्यथा महाराष्ट्राची पिछेहाट होईल अशी टीका रामदास कदम यांनी केली आहे. उद्धव ठाकरे यांचा आज ६४ वा वाढदिवस आहे, रश्मी ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे आणि शिवसैनिकांनी आज मध्यरात्री सुद्धा उत्साहात ठाकरेंच्या वाढदिवसाचे सेलीब्रेशन केले.
Recover your password.
A password will be e-mailed to you.