Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लोकसभेच्या निकालाने मी नाराज नाही, पराभवाला मी स्वत: जबाबदार; रोखठोक दादांकडून विषय एन्ड

8

दीपक पडकर, बारामती : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीत बरेच दिवस आले नव्हते. याबाबत बारामतीत अनेक जण उलट सुलट चर्चा करत होते. यावर अजित पवार यांनी आपली रोखठोक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अजित पवार म्हणाले की, बारामती तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागातील पाणी प्रश्न सोडवण्याच्या कामात मी व्यस्त होतो. त्यामुळे त्या काळात मी येऊ शकलो नाही. त्यामुळे अनेकांना वाटलं की मी नाराज आहे काहीतरी गडबड आहे. मात्र मी नाराज नाही. मी मागेच जाहीर केलं आहे की, झालेल्या पराभवाला मी स्वतः जबाबदार आहे, अशी रोखठोक प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

बारामती तालुक्यातील जानाई शिरसाई उपसा सिंचन योजनेतून बारामती तालुक्यातील बोरकरवाडी तलावात बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी पोहोचवण्याच्या कामाचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झालं. त्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते.
Uddhav Thackeray : माझ्या पायाशी कोणीतरी टरबूज ठेवलंय, ढेकनांना आव्हान नसतं, अंगठ्याने चिरडायचं; उद्धव ठाकरेंचा टोला

लाडकी बहीण योजनेची विरोधकांकडून बदनामी आणि अपप्रचार

अंतरिम अर्थसंकल्पाच्या माध्यमातून गरीब वर्गाला काहीतरी चांगलं देण्याचा प्रयत्न मी आणि माझ्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी केला आहे. या माध्यमातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली गेली. ही योजना देखील खूप लोकप्रिय झाली आहे. काही जणांना हे आवडलेलंच नाही. त्यामुळे ते बदनामी आणि अपप्रचार करत आहेत, असा टोलाही पवारांनी विरोधकांना लगावला.
Temple Wall Collapsed : धार्मिक कार्यक्रमावेळी मंदिराची भिंत कोसळली, दुर्घटनेत ९ लहान मुलांचा मृत्यू तर ४ जखमी
ते पुढे म्हणाले, मी अनेक ठिकाणी भेटणाऱ्या माता-भगिनींना विचारत असतो. आपण अर्ज वगैरे केलेत का? या योजनेच्या माध्यमातून गरीब वर्गातील माता-भगिनी, मुलींना मदत करण्याचा आमचा हेतू आहे. या योजना आपल्याला पुढे देखील चालू ठेवायच्या आहेत. मात्र विरोधक आमच्यावर वेगवेगळे आरोप करतात.
Chetan Bhagat on Rahul Gandhi: राहुल गांधी पुढील पंतप्रधान होऊ शकतात, प्रख्यात लेखकाचं भाकित, कारणही सांगितलं

उद्या लोकांच्या दारात गेलो तर…

या योजना म्हणजे चुनावी जुमला आहे. मी या राज्याचा दहा वर्ष अर्थमंत्री होतो आणि आहे. त्यामुळे राज्याच्या कोणत्या योजनेला किती निधी द्यायचा याचं सारं गणित आम्हाला ठाऊक आहे. त्यामुळे हा निर्णय आम्ही विचारपूर्वक घेतलेला आहे. त्यामुळे जर फसवाफसवी केली आणि आम्ही उद्या लोकांच्या दारात गेलो तर काहीही थापा मारतो, असं आम्हाला म्हणतील.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.