
Tej Police Times
दरम्यान, संमेलनस्थळ जाहीर होण्याआधीच दिल्लीतील अनेक मराठी भाषकांनी या संमेलनासाठी कार्यकर्ता म्हणून काम करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे ‘सरहद्द’चे संजय नहार यांनी सांगितले. संमेलनासाठी चार ते पाच हजार साहित्यरसिक येतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. मराठीच्या अभिजात दर्जासोबतच दिल्लीतील मराठी अस्मितेसाठीही हे संमेलन महत्त्वाचे ठरेल. निवडणुकांमुळे दुखावली गेलेली मने संमेलनाच्या निमित्ताने एकत्र येतील. दिल्लीच्या महाराष्ट्र भवनात सर्व पक्षांचे लोक एकत्र येतात. त्याच पद्धतीने संमेलनातही ही मने सांधली जातील. महाराष्ट्र आणि दिल्ली भावनिक अंतर कमी करण्यासाठी हे संमेलन मदत करेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अध्यक्षांची निवड ऑक्टोबरमध्ये
या आधी १९५४मध्ये दिल्लीत साहित्य संमेलन झाले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर एकही मराठी साहित्य संमेलन दिल्लीत झालेले नाही त्यामुळे शताब्दीच्या उंबरठ्यावरील या साहित्य संमेलनाला वेगळे महत्त्व असेल, असेही सांगण्यात येत आहे. महामंडळ फेब्रुवारी अखेरचा आठवडा किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात संमेलन आयोजनाचा विचार करीत आहे. महामंडळाची ऑक्टोबरमध्ये पुण्यात बैठक होणार असून त्यात संमेलनाच्या अध्यक्षांची निवड करण्यात येईल, अशी माहिती महामंडळाच्या कार्यवाह डॉ. उज्ज्वला मेहेंदळे यांनी दिली.
Recover your password.
A password will be e-mailed to you.