
Tej Police Times
दरम्यान, शहरात सर्रास वृक्षतोड होत असून याप्रकरणी कोणतीही कारवाई केल्याचं समोर येत नाही. बांधकामासाठी, रस्ते कामासाठी तसंच इतर अनेक कामांसाठी अतिशय जुन्या वृक्षांची तोड होते. मात्र त्यावर कोणतीही कारवाई होत नाही. अशात आता शिंदे आणि फडणवीस सरकारने ५० हजार रुपये दंड आकारण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे. यामुळे वृक्षतोडीला आळा बसणार असून वृक्षतोडीमुळे होणारा निर्सगाचा ऱ्हास थांबवण्यासह काही प्रमाणात मदत होणार आहे. मुंबईत होणारी ही वृक्षतोड चिंतेचा विषय ठरत आहे. मागील काही वर्षातील आकडेवारीनुसार, मुंबईत मेट्रो, बुलेट ट्रेन, कोस्टल रोड तसंच इतर रोडच्या कामांसाठी मागील सहा वर्षात तब्बल २१ हजार झाडांची तोड झाल्याची आकडेवारी आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.