Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Raj Thackeray : राज्यात आरक्षणाची गरज नाही, शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी राजकरण करतायत

12

मुंबई : मराठवाडा दौऱ्याची सांगता करत राज ठाकरेंनी थेट आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले आहे. मराठवाडाच्या दौऱ्या दरम्यान राज ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली तसेच मराठा समाजाकडून त्यांचा विरोध होतोय असे चित्र दिसले. यानंतर राज ठाकरे यांनी स्वत:च समोर येत आरक्षणावर आपली भूमिका जाहीर केली आहे. महाराष्ट्राला आरक्षणाची गरज नाही असे मला वाटते अशी ठाम भूमिका आज राज ठाकरेंनी मराठवाड्याचा दौऱ्यावर असताना केले आहे. राज ठाकरे म्हणाले,आपल्या महाराष्ट्रा सारखे सदन राज्य देशात नाही. माझा पक्ष २००६ साली स्थापना केला आहे. तेव्हाच भूमिका मांडली होती की राज्यात आरक्षण आर्थिक परिस्थितीवर द्यावे पण आपल्याकडे जातीपातीचे राजकरण सुरु आहे.

मराठवाडा दौऱ्यात जातीय राजकरणाचे चटके

माझ्या दौऱ्यात मनोज जरांगेंचा काही संबंध नव्हता पण मनोज जरांगे यांच्याआडून शरद पवार आणि उद्धव ठाकरेंसारखी मंडळी राजकरण करतायत, मला मराठवाड्यात तसे दिसतंय. काही पत्रकार सुद्धा खतपाणी घालतात. धाराशीवला आलेल्या लोकांना भडकवण्याचे काम पत्रकारांनी केले, त्यातील दोनजण शरद पवारांच्या जवळचे आणि उद्धव ठाकरे गटाचे दोघेजण होते असा आरोप राज ठाकरेंनी लगावला आहे.
Jitendra Awhad : सहा डिसेंबरला राज ठाकरे लोणावळ्याला जातात, जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

मराठवाड्याच्या दौऱ्यावर निघालो तर राज ठाकरे विरूध्द मराठा समाज असा बातम्या माध्यमांमध्ये दिसल्या. पक्ष स्थापनेपासून भूमिका एकाच आहे आरक्षण आर्थिक निकषावर द्यावे.महाराष्ट्रात आरक्षणाची गरज नाही शिक्षण उद्योग उपलब्ध असताना इतर राज्यातील मुलांना मिळतं मात्र आपल्या राज्यातील मुलांना मिळत नाही.पुरून उरेल एवढ्या गोष्टी आपल्याकडे आहेत असे ठाकरे म्हणाले. पुढे ठाकरे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मागणीमागून उद्धव ठाकरे आणि शरद पवार मुद्दाम जातीय दंगली भडकवत आहेत.
Raj Thackeray : शरद पवार आणि उद्धव ठाकरेंनी नादाला लागू नये! माझी पोर काय करतील कळणार नाही, आरशात गाल बघावा लागेल

मराठा, ओबीसी आणि दलित बांधवांनी समजून घ्यावे राजकरणासाठी जातीचे राजकरण केले जात आहे. शरद पवारांसारखे नेते बोलतात राज्याचे मणिपूर होईल म्हणजे जातीचा द्वेष पसरवला जातोय. निवडणुका येतील निवडणुका जातील पण सतत त्याचावर काहीजण मीठ टाकत राहतील. जातीपातीच्या राजकरणात अडकू नका. महाराष्ट्रात परप्रांतीय लोक येतात आणि नोकरी करतात पण राज्यसरकार अनेक गोष्टी, नोकरींच्या संधी ग्रामीण भागात पोहचवत नाही.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे येत्या २१ ऑगस्टपासून विदर्भाच्या दौऱ्यावर येणार आहेत. मराठवाड्याचा पहिला टप्पा आटोपल्यावर त्यांचा दुसरा टप्पा २० तारखेपासून सुरू होत आहे. या दौऱ्यात काही उमेदवारांची घोषणा करण्याचे संकेत आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.