तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

कोकणवासीयांसाठी Good News! गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाकडून २००० अतिरिक्त बसेसची व्यवस्था

0 38

म. टा. प्रतिनिधी, ठाणे : गणेशोत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या संख्येने ठाणेकर रहिवासी कोकणातील आपल्या गावी जातात. बसेसअभावी त्यांच्यासह अन्य ठिकाणी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी एसटीच्या ठाणे विभागाने खास गणेशोत्सवानिमित्त नियमित बसेस व्यतिरिक्त २ हजार २३ जादा बसेसची सोय केली आहे. या बसेसपैकी आतापर्यंत ५०१ बसेसचे ग्रुप बुकिंग आणि ३००पेक्षा जास्त बसेसचे आरक्षण फुल्ल झाले आहे. गतवर्षीपेक्षा यंदा अधिक जादा बसेस सोडण्यात आल्याची माहिती एसटीच्या ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिली.

गणेशोत्सवाला अद्याप २५ दिवसांचा अवधी बाकी आहे. मात्र, आतापासूनच प्रत्येकाला गणपतीच्या आगमनाचे वेध लागले असून विविध ठिकाणी आकर्षक गणेश मूर्ती विक्रीसाठी उपलब्ध आहेत. कोकणामध्येही उत्साहात गणेशोत्सव साजरी होत असून त्यासाठी दरवर्षी मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवलीसह अन्य परिसरातील मोठ्या प्रमाणावर कोकणवासी गावी जात असतात. परिणामी रेल्वेचे बुकिंग अगोदर फुल्ल होऊन जाते. खासगी बसने जाय़चे झाल्यास प्रवाशांना तिकिटासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. कारण, गर्दीच्या हंगामात खासगी बसेसच्या तिकीटाचे दर वाढलेले असतात. अशावेळी गावी जायचे कसे, असा प्रश्न निर्माण होत असला तरी एसटीकडून गणेशोत्सवानिमित्त जादा बसेस सोडल्या जातात. जेणेकरून कोकणवासीयांना गावी जाता येणार आहे.

२ सप्टेंबरपासून सुटणार

एसटीच्या ठाणे विभागाकडून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगडसह कोल्हापूर, सांगली, सातारा येथे जाण्यासाठी नियमित बसेससह जादा २ हजार ३२ बसेसचे नियोजन केले आहे. या बसेसपैकी १ हजार ५६८ बसेस ग्रुप बुकिंगसाठी आणि ४६४ गाड्या आरक्षणासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्यासाठी नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर येथून जास्तीच्या गाड्या मागण्यात येणार असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली. जादा बसेस २ ते ६ सप्टेंबर या कालावधीत सोडण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

८३९ गाड्यांचे आरक्षण

नियोजित बसेसपैकी ५०१ बसेसचे ग्रुप बुकिंग आणि ३३८ बसेसचे आरक्षण फुल्ल झाले आहे. अशाप्रकारे एकूण ८३९ बसेस आताच फुल्ल झालेल्या आहेत. गेल्यावर्षी याच विभागातून गणेशोत्सवानिमित्त ग्रुप बुकिंगसाठी १ हजार ४९३ आणि आरक्षणासाठी ४६४ अशा एकूण १ हजार ९५७ बसेस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. यंदा अधिक बसेस सोडण्यात येणार आहेत.

किती आणि कुठून जादा बसेस सुटणार

  • बोरिवली- ५००
  • भाईंदर-२३
  • ठाणे सीबीएस- ५९०
  • मुलुंड- १२
  • भांडुप- १३६
  • कल्याण- ६२०
  • विठ्ठलवाडी- १५२

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.