तेज पोलीस टाइम्स | पोलीस आणि जनतेचा आवाज

शांततापूर्ण आंदोलनाला गालबोट लागलं, नाशकात दोन गट एकमेकांना भिडले, नेमकं काय घडलं?

0 66

नाशिक : बांगलादेशातील मुद्द्यावरुन नाशिकमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. बांगलादेशात हिंदूंवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात नाशिकमध्ये हिंदू समाजाकडून बंद पुकारण्यात आला आहे. यामुळे सकाळपासून नाशिकमधील सर्व बाजार बंद आहेत. हिंदू समाजाकडून नाशिक बंदची हाक देण्यात आली होती. या शांततापूर्ण आंदोलनाला गालबोट लागलं आणि दुकानदार-तरुण भिडले. बंदवेळी दोन जमावांनी रस्त्यावर एकत्र येत मेम रोड परिसर आणि पिंपळ चौकात दगडफेक केली. यात वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने मोठं नुकसान झालं आहे. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी अश्रूधुराचा माराही करण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर, अहमदनगरमध्येही आंदोलन

नाशिकआधी छत्रपती संभाजीनगर, अहमदनगरमध्येही जमावाकडून मोठं आदोलन करण्यात आलं. रामगिरी महाराजांनी नाशिकच्या सिन्नरमधील पंचाळे गावात केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मुस्लीम समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या. सिन्नर तालुक्यात सद्गुरु गंगागिरी महाराज संस्थानचा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. याच सप्ताहात रामगिरी महाराज यांनी प्रेषित महमंद पैगंबर यांच्याविरोधात टीपणी केली. त्यामुळे मुस्लीम समाजाच्या भावल्या दुखावल्या गेल्या आणि नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये जमावाने रस्त्यावर उतकत याविरोधात आंदोलन सुरू केलं.
TMC Leader Kunal Ghosh : रेप कुठे होत नाहीत? कोलकाता डॉक्टरच्या हत्येनंतर TMC नेत्याचं संतापजनक वक्तव्य

छत्रपती संभाजीनगरमध्ये जमाव रस्त्यावर उतरुन आंदोलन

रामगिरी महाराजांविरुद्ध छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा जमाव सिटी चौक भागामध्ये जमला आहे. रामगिरी महाराजांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या जमावाच्या वतीने करण्यात येत आहे. तसंच जमावाने टायरही जाळले. कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. दंगा काबू पथक देखील तैनात करण्यात आला आहे. याआधी १६ ऑगस्टच्या रात्रीही आंबेडकर चौकात मोठा जमाव जमला होता. आता छत्रपती संभाजीनगरमध्ये १६ ऑगस्ट ते १९ ऑगस्टपर्यंत जमावबंदीचे आदेश देण्यात आले आहेत.
Waqf Bill Amendment News: साडे नऊ लाख एकर जमिनीवर मालकी, पण आता धाकधूक वाढली, वक्फ बोर्डाचं विधेयक नेमकं काय आहे?

रामगिरी महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद छत्रपती संभाजीनगर नंतर अहमदनगरमध्येही दिसून आले. रामिगिरी महाराज यांनी प्रेषित महमंद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह विधान केल्यानंतर या विधानावरुन मुस्लीम समाजात मोठा संपात व्यक्त होत आहे. रामगिरी महाराज यांच्या विधानाविरोधात अहमदनगरातही आंदोलन करण्यात आलं. रामगिरी महाराजांच्या वक्तव्यानंतर त्यांच्याविरोधात नाशिक, येवला आणि वैजापूर इथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.