
Tej Police Times
घडलेली घटना दुर्दैवी आहे, एका लहान बाळाबाबत जे घडलं ते दुर्दैवी आहे. आरोपीला कठोर शिक्षा व्हावी असे आदेश कालच आयुक्तांना दिले होते. त्यावर कारावाई देखील सुरु झाली आहे. त्याच्यावर कठोरातील कठोर कलमं लावण्यात आली असून हे प्रकरण फास्ट ट्रॅकवर नेण्याच्या सूचना दिल्या आहेत. याप्रकरणी एसआयटी नेमण्यात आली आहे. पोलिसांवर गुन्हा दाखल करण्यात दिरंगाई केल्याचे आरोप होते. त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.
Badlapur Girls Assault: आई, मला ‘शू’च्या जागी मुंग्या चावतायत, बदलापूर अत्याचाराची घटना अशी झाली उघड
त्या कुटुंबाच्या मागे सरकार खंबीर आहे. कुटुंबाला मदत करण्यात येणार आहे. संस्थाचालकाचीही चौकशीचे आदेश दिले आहेत, मुलींना सांभाळण्यासाठी महिलाच असल्या पाहिजे, या नियमाचा भंग जो करेल त्याच्यावर कारवाई करण्यात येईल, तसे आदेश केसरकरांना दिले आहेत. तसेच, भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी अधिक कडक नियम करण्यात येतील, अधिक काळजी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत, कठोर शिक्षेच्या सूचना दिल्या आहेत.
लाखो प्रवाशांना काल त्रास झाला. त्यामध्येही महिला, लहान मुलं, वृद्ध होते, पण कालच्या आंदोलनामुळे प्रवाशांना जो त्रास झाला तो दुर्दैवी आहे.
कालचं जे आंदोलन होतं ते राजकीयदृष्ट्या प्रेरीत होते, असं माझं म्हणणं आहे. कारण इतक्या लवकर आंदोलन कसं झालं, जेव्हा कुठलं आंदोलन होतं तेव्हा तिथे स्थानिक लोक असतात, इथे स्थानिक हे हाताच्या बोटावर मोजण्याइतके होते. इतर ठिकाणाहून गाड्या भरुन भरुन आंदोलक आले होते. मंत्रीमहोदयांनी समजवलं की तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या आहेत, तरी ते हटायला तयार नव्हते. याचाच अर्थ त्यांना, सरकारला बदनाम करायचं होतं. इतक्या वेळ ८-९ तास रेल्वे रोखणं हे देशाचं, रेल्वे संपत्तीचं नुकसान आहे.
राजकारण करायला खूप गोष्टी आहेत, एका लहान बच्चूसोबत जे घडलं त्याचं तुम्ही राजकारण करता, ज्याने केलं त्याला लाज वाटली पाहिजे. गाड्याभरुन आंदोलनकर्ते आले होतं, सीसीटीव्ही फुटेजमध्ये सगळं दिसत आहे. जे आले होते ते मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे बोर्ड घेऊन आले होते, असं कुठे आंदोलन असते का? ताबडतोब बोर्ड छापून आणतात का, लाडकी बहीण योजनेचे पैसे नको, मुलगी सुरक्षित पाहिजे, लाडकी बहीण नको, सुरक्षित बहीण पाहिजे, बहिणीला सुरक्षा देण्याची जबाबदारी आमची, ते आम्ही करु, कोणालाही पाठिशी घालणार नाही.
बदलापुरातील एका नामांकित शाळेत दोन साडेतीन वर्षांच्या चिमुकलींवर अत्याचार झाला. त्याविरोधात काल संतप्त बदलापूरकरांनी तीव्र आंदोलन पुकारलं. यावेळी बदलापूर रेल्वे स्थानकात हे आंदोलन पुकारण्यात आलं असून तब्बल १०-११ तास हे आंदोलन सुरु होतं, त्यामुळे रेल्वे सेवेला याचा मोठा फटका बसला. मंत्री गिरीश महाजन आणि पोलिसांनी आंदोलकांना समजावण्याचा प्रयत्न केला पण ते ऐकायला तयार नव्हते. अखेर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज करत आंदोलकांना रेल्वे रुळावरुन बाजुला केलं.
Recover your password.
A password will be e-mailed to you.