Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बळीराजाचे होत आहेत हाल;८२ हजार शेतकरी पीककर्जापासून वंचित….

8

यवतमाळ: खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण झाल्या असल्या तरी ७२.४७ टक्केच पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट साध्य झाले आहे. एकट्या यवतमाळ जिल्ह्यातील ८२ हजार शेतकरी पीककर्जापासून वंचित आहेत. जिल्हा बँकेकडे निधी नसल्याने तर राष्ट्रीयकृत बँकांजवळ निधी असूनही कर्जवाटप करण्यात आलेले नाही. पीककर्जापासून वंचित शेतकऱ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेत कर्जमाफी न मिळालेल्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्रीद्वय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार उद्या, २४ ऑगस्टला महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमाच्या निमित्ताने येत आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी पीककर्ज मिळत नसल्याने अडचणीत सापडला आहे. कर्जवाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांनी बँकांना अनेकदा निर्देश देऊनही परिणाम दिसला नाही. पीककर्जापासून वंचित शेतकऱ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.
Salil Deshmukh: शेतकरी कधी लाडका होणार? फळगळतीवरुन सलील देशमुखांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी २०१७मध्ये छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली होती. २०१९मध्ये राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ही योजना मागे पडली. राष्ट्रीयकृत व यवतमाळ जिल्हा बँकेचे १ लाख २८ हजार शेतकरी लाभापासून वंचित राहिले. गेल्या पाच वर्षांपासून कर्जमाफी मिळेल या आशेवर हे शेतकरी आहेत.
Ladki Bahin Yojana: अन्नपूर्णा योजनेची घोषणा, पण ७० टक्के लाडक्या बहिणी मोफत ३ सिलिंडरपासून राहणार वंचित, कारण काय?
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी अनेकदा आश्वासन दिले. शेतकऱ्यांचा सात-बारा कोरा झाला नाही. त्यातील काही शेतकरी उच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने शासनाला निर्देश दिल्यानंतर उच्चस्तरावर अधिकाऱ्यांच्या अनेक बैठका झाल्या. अर्थसंकल्पात निधीची तरतूद करण्यात आली. शासकीय आदेश अद्याप न निघाल्याने या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. आता मुख्यमंत्र्यांनी विशेष लक्ष देऊन यासंबंधी शासकीय आदेश काढावा, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
तीन सप्टेंबरला शेतकऱ्यांचा ‘ट्रॅक्टर मार्च’; नाशिक ते मुंबई हजारो शेतकरी करणार प्रस्थान, काय कारण?

आकडे बोलतात…

राष्ट्रीयकृत बँका…

पात्र शेतकरी : १,१९,६५०
कर्जवाटपाचे उद्दिष्ट : १,२०३ कोटी
कर्जप्राप्त शेतकरी : ६६,९८२
कर्जवाटपाची रक्कम : ७८८ कोटी
टक्केवारी : ६५%

खासगी बँका

पात्र शेतकरी : ८,८१५
कर्जवाटपाचे उद्दिष्ट : १३५ कोटी
कर्जप्राप्त शेतकरी : ३,०६७
कर्जवाटपाची रक्कम : ६६ कोटी
टक्केवारी : ४८.७३%

विदर्भ कोंकण ग्रामीण बँक

पात्र शेतकरी : १८,०००
कर्जवाटपाचे उद्दिष्ट : १६१ कोटी
कर्जप्राप्त शेतकरी : १२,६३९
कर्जवाटपाची रक्कम : १७२ कोटी
टक्केवारी : १०६%

यवतमाळ जिल्हा बँक

पात्र शेतकरी : ८५,०००
कर्जवाटपाचे उद्दिष्ट : ६९८ कोटी
कर्जप्राप्त शेतकरी : ६६, ७६४
कर्जवाटपाची रक्कम : ५६७ कोटी
टक्केवारी : ८१%

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.