
Tej Police Times
सध्या आपण आपल्या कामात इतके व्यस्त असतो की भगवंताचे काय कुटुंबाकडे देखील आपला दुर्लक्ष होतो. मला हे हवंय…मला ते हवंय..या हव्यासापायी आपण धावपळ करतो आणि आपला ताणतणाव वाढवून घेतो. हा त्रास कमी करण्यासाठी ईश्वराचे नामस्मरण करणे अधिक गरजेचे आहे. शास्त्रात याबद्दल अनेक सोपे आणि प्रभावी उपाय सांगितले गेले आहेत, जे तुम्हाला ईश्वराचे स्मरण ठेवण्यात आणि त्यांच्याजवळ राहण्यास मदत करतात.
या जगात देव आहे आणि तो वेळोवेळी तुम्हाला मदत करतो यावर आधी तुम्ही विश्वास ठेवा. तुम्हाला ईश्वराचे प्रेम, आपुलकी आणि आशिर्वाद मिळावेत असे वाटत असेल तर देवावर विश्वास ठेवणे महत्त्वाचे आहे. देव या जगात आहे यावर तुमचा विश्वास बसला तर तुम्ही त्याला जाणून घेण्याचा अधिक प्रयत्न कराल तसेच त्याचा आशिर्वाद प्राप्त करण्याचाही प्रयत्न कराल.
भगवंताच्या नावाचा जप करणे किंवा नामस्मरण हा कलियुगातील आत्मा शुद्ध ठेवण्यासाठी अतिशय प्रभावी उपाय आहे. नामस्मरण तुम्ही कधी ही करु शकता त्याला विशेष असे नियम किंवा बंधन नाही. ईश्वराच्या जवळ जाण्याचा किंवा त्यांचा आशिर्वाद प्राप्त करण्याचा हा सोपा मार्ग आहे.
सत्संग आणि भजन ऐकायला कोण जाणार असे आपण अनेकदा ऐकतो पण सत्संग आणि भजन मनाला शांतता आणि समाधान देतात. यामुळे मनात सात्विक विचार येत असून मन विचलीत होत नाही. तुम्ही नियमीतपणे प्रार्थना आणि ध्यानधारणा केली तर मनाची एकाग्रता वाढते आणि भगवंताबद्दलची भक्तीभावना दृढ होते.
भगवद् गीता आणि इतर धार्मिक ग्रंथांचे अध्ययन करा. अनदिकाळापासून हे ग्रंथ मानवाला चांगेल काय आणि वाईट काय याबद्दल मार्गदर्शन करत आहेत. यातील उपदेश तुम्हाला जीवनातील योग्य मार्ग नक्की दाखवतील. यामुळे तुमच्या जीवनाला योग्य दिशा मिळेल.
आपल्या शास्त्रात व्रत आणि उपवास सांगितलेले आहेत. उपवास केल्यामुळे मनासोबत शरीरदेखील शुद्ध होते. व्रत केल्यामुळे आत्मसंयम वाढतो. तुम्हाला मनाची आणि तनाची शुद्धी करायची असेल तर हे दोन उपाय आहेत. यामुळे मन आणि आत्मा शुद्ध तर होतोच शिवाय आपल्याला शीस्त लागते.
पवित्र स्थळांना भेट दिल्याने मनःशांती मिळेत तसेच भगवंताबदद्लची भक्ती वाढते. तीर्थक्षेत्र किंवा जागृत देवस्थान यामध्ये असणारी आध्यात्मीक शक्ती तुमच्या मनाला समाधान देते तसेच तुम्हाला ईश्वराच्या अधिक समीप घेऊन जाते. तिर्थयात्रा केल्यामुळे तुमचे आध्यात्मिक विचार दृढ होतात.
नेहमी सकारात्मक विचार ठेवणे आणि चांगल्या आचरणाचे पालन केले तर जीवनात सुख-शांती आणि समाधान टिकून राहते. मनात वाईट विचार निर्माण होण्याची शक्यता कमी होते आणि शारीरिक ऊर्जा वाढते
गरजूंची सेवा करणे आणि दान देणे यामुळे फक्त तुम्ही इतरांना मदत करत नाही, तर तुमचे कर्मही शुद्ध करता. तसेच तुम्ही आज मदत केलीत तर तुमच्या अडचणीच्या काळात तुम्हाला नक्की मदत मिळते.
लेखकाबद्दलअनिता किंदळेकरअनिता किंदळेकर जवळपास १५ वर्षांपासून प्रिंट, टेलिव्हिजन आणि डिजीटल माध्यमात पत्रकार, कंटेट रायटर, एआय लँग्वेज टुटर, भाषांतरकार, ब्लॉगर, म्हणून कार्यरत आहे. बातम्यांसह विविध विषयांवर लेख लिहीणे आणि भाषांतराचा उत्तम अनुभव आहे. विशेष करुन आध्यात्मिक, धार्मिक आणि सण-वार-उत्सव यासंबंधी अचूक माहिती घेवून सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवण्यात पारंगत आहे. एआयसाठी विविध विषयांवर आधारित कन्टेन्ट तयार करणे आणि रेकॉर्डिंग केले आहे. वाचन,मेडिटेशन, योगामध्ये रुची असून कथा लेखन करायला आवडते. अनेकदा ब्लॉगच्या माध्यमातून ती आपल्या भावना व्यक्त करते…. आणखी वाचा
Recover your password.
A password will be e-mailed to you.