
Tej Police Times
Mumbai News : आईच्या मृत्यूनंतर वडिलांकडून दोन वर्षांच्या मुलाची विक्री, असा समोर आला धक्कादायक प्रकार
मुलांमध्ये रागाने घर सोडण्याचे प्रमाण अधिक
मागील साडेपाच वर्षांमध्ये सुमारे ५०० मुले बेपत्ता झाल्याची नोंद झाली असून यातील ४७० मुलांचा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष तसेच, स्थानिक पोलिसांनी शोध घेऊन त्यांना पालकांच्या ताब्यात दिले आहे. यातील बहुतांश मुले ही आईवडील अभ्यासावरून रागावल्यामुळे, खेळू न दिल्यामुळे, परीक्षेत नापास होण्याच्या भीतीने किंवा इतर काही किरकोळ कारणांवरून रागाच्या भरात घर सोडून गेल्याचे आढळून आले आहे. तर काही मुले मजा-मस्ती म्हणून घर सोडून गेल्याचे तपासात समोर आले आहे.
झोपडपट्टी भागात अधिक घटना
नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीत ज्या भागात झोपडपट्टी व मध्यमवर्गीय वस्ती आहे, अशा भागात अल्पवयीन मुले व मुलींच्या अपहरणाचे प्रकार समोर आले आहेत. रबाळे, कोपरखैरणे, पनवेल शहर, रबाळे एमआयडीसी, तुर्भे एमआयडीसी व तळोजा या पोलिस ठाण्यांच्या अन्य विभागांच्या तुलनेत मुलामुलींच्या अपहरणाचे प्रकार अधिक आहेत. त्यामुळे येथील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न गंभीर असल्याचे समोर आले आहे. या भागात पोलिसांनी विशेष लक्ष देऊन हे प्रकार थांबवण्याची गरज असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.
Recover your password.
A password will be e-mailed to you.